असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संत मुक्ताई मंदिरात तुळशी विवाह व पादुका मिरवणुकीचा भव्य सोहळा पार पडला!
मुक्ताईनगर (अतिक खान) संत मुक्ताईच्या पावन भूमीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम घडविणारा श्री स्वामी समर्थ पादुका आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास केंद्र, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या वतीने प्रस्थान ठेवलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुका दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुक्ताईनगर येथे आगमन झाल्या. या आगमनाचे औचित्य साधून कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळी निमित्त नवीन संत मुक्ताई मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला. या वेळी असंख्य सेवेकरी भगिनी, भक्त, महिला मंडळे आणि सेवेकरी बांधवांनी हजेरी लावून अध्यात्माच्या सागरात न्हाऊन निघाले.
भव्य मिरवणुकीने उजळली मुक्ताईनगरी! ६ नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी नवीन मुक्ताई मंदिरापासून श्री स्वामी समर्थ केंद्र, जुने गाव मुक्ताईनगरपर्यंत स्वामींच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघाली. संपूर्ण पालखी मार्ग फुलांच्या आणि रांगोळ्यांच्या सजावटीने सुशोभित झाला होता. श्रद्धाळूंनी ठिकठिकाणी पादुकांचे पूजन, आरती, फुलवर्षाव आणि भक्तिगीतांद्वारे स्वागत केले.
“जय जय स्वामी समर्थ!” च्या घोषात वातावरण दुमदुमून गेले. सेवेकरी बांधवांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. भाविकांना नितीनकुमार जैन यांनी पिण्याच्या पाण्याचे वाटप करून प्रशंसनीय सेवा बजावली.
आध्यात्मिक एकतेचा संदेश देणारा हा पादुका सोहळा भक्तांच्या अंत:करणात नवी श्रद्धा, भक्ती आणि समाधान निर्माण करून गेला. मुक्ताईनगर शहर भक्तीमय रंगात न्हाऊन निघाले आणि संत परंपरेचा वारसा या सोहळ्याद्वारे पुन्हा उजळून निघाला.
स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) चे पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण
मलकापुर :- तालुक्यातील मोरखेड दहा गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मलकापुर तालुक्यातील मोरखेड, दुधलगाव, लोणवडी,खामखेड, गौलखेड, आळंद, हरणखेड तसेच मोताळा तालुक्यातील न्हावी, दाभाडी, माकोडी या गावातील नागरिकांना मागील अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा केला जातो. वॉटर फ़िल्टर बसवा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या या मागणीसाठी आज दि.28 जुलै 26 रोजी युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे व माजी युवासेना तालुकाप्रमुख गणेश सुशीर यांच्यासह जगदीश पाटील,विलास पाटील,चेतन पाटील,गणेश दिक्षीत,क्रिष्णा पाटील,गौरव ठोसर,ईश्वर झनके,लक्ष्मण भिस्ते आदि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क पाण्याच्या टाकीवरच जनआंदोलन सुरु केले आहे. जो पर्यंत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी. या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी शिवसेना (उबाठा) जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अजय सावळे यांनी दुधलगाव येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता एक महिन्याच्या आत सर्व प्रकरणावर मार्ग निघून गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा होईल असे लेखी आश्वासन पाणीपुरवठा अधिकारी यांनी दिले.
यावेळी आंदोलन करते गणेश सुशीर ,संजय झनके,गोविंदा झनके, अमोल झनके, अमोल भगत, मोहन शिरसाट, तर प्रशासनातर्फे ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी माने मॅडम, ग्रामसेवक अर्चना माहुरे, प्रशांसक यशवंत पाटील , आणि असंख्य गावकरी उपस्थित होते
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
मलकापुर:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नगरातील आई तुळजाभवानी मंदिरात माल्या अर्पण करून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,राजुभाऊ वाडेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.तसेच छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून माल्यार्पण करण्यात आले, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व दाताळा येथील सेवातीर्थधाम वृद्धाश्रमातील वृद्धांना फळे, बिस्कीट वाटप आत्मानंद जैन मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी सह संपर्कप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शकील जमादार, माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे, कामगार सेना तालुका प्रमुख राम थोरबोले, किसान सेना उपतालुकाप्रमुख विश्वनाथ पुरकर, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, लक्ष्मण दोळे,विजय झांबरे,नासीरभाई,चाॅद चव्हाण, किशोर राउत, गणेश सुरळकर सह आदिंची उपस्थिती होती.
मलकापुरात ‘चिल्ड्रेन बँक’च्या बनावट नोटांच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद; दोन आरोपी अटकेत, 2.45 लाखांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांना कमी रकमेच्या मोबदल्यात जास्त रकमेच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. शनिवारी, 26 जुलै 2026 रोजी मलकापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कुंड परिसरात सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून रोख रक्कम, चिल्ड्रेन बँकेच्या बनावट नोटा, मोबाईल, चाकू आणि मोटारसायकल असा एकूण 2 लाख 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटकांकडून नागरिकांना एक लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना घडत असल्याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घेतली होती. त्यांनी अशा टोळ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी विशेष पथके तयार करून कारवाईचे नियोजन केले.
कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला येथील सुभाष माणिकराव गावंडे यांना मलकापूर परिसरात काही जण दहा लाख रुपयांच्या नोटांचे आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कुंड परिसरात सापळा रचून अभिषेक भीमराव इंगळे (वय 20, रा. कुऱ्हा-काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) आणि मयूर सुनील खानझोडे (वय 19, रा. कुऱ्हा-काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले.
आरोपींच्या ताब्यातून 5 हजार रुपये रोख, दर्शनी किंमत 10 लाख रुपये असलेल्या ‘चिल्ड्रेन बँक’च्या बनावट नोटा, एक चाकू, चार मोबाईल फोन आणि स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा एकूण 2 लाख 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुभाष माणिकराव गावंडे यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 553/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 310(2) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील घटनास्थळावरून पसार झालेल्या आणखी सहा आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा आणि मलकापूर शहर पोलीस घेत असून, गुन्ह्याचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, प्रशांत डगवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र अंभोरे तसेच गजानन दराडे, गणेश पाटील, अनुपकुमार मेहेर, विजय पैठणे, राकेश नायडू, गजानन गोरले, अमोल वानेरे, मनोज खरडे आणि सतीश नाटेकर यांनी सहभाग घेतला.
बसच्या मागणीसाठी टाकळी घडेकर येथील विद्यार्थ्यांची शिवसेना (उबाठा) ने आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात भरविली शाळा
सकाळच्या बससाठी दोन कि.मी पायी ये-जा व दुपारच्या गाडीवर शाळेच्या दोन तासिका सोडून यावे लागत असल्याने शिवसेना (उबाठा)ने आगार व्यवस्थापकांना महिना भरापुर्वी दिले होते निवेदन
बस टाकळी घडेकर गावापर्यंत व सकाळ- सायंकाळचे टाईम बदलविण्याची मागणी
मलकापुर:- मलकापूर ते पोफळी ही बस टाकळी फाट्यावरून जात असून टाकळी घडेकर येथील विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर टाकळी फाट्यावर पायी ये-जा करावी लागते तसेच दुपारी 3 वाजताच परतीची बस असल्याने शाळेच्या दोन तासिका सोडून यावे लागत असल्याने विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी दि.1 जुलै 26 रोजी महिना भरापुर्वी आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिले महिना उलटूनही बस टाकळी गावात न आल्याने व दुपारच्या बस ची अद्यापही वेळ न बदलविल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या दोन तासिका सोडून यावे लागत असल्याने आज दि.24 जुलै 26 रोजी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात विद्यार्थी, पालक व शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी शाळा भरविल्याने एकच खळबळ उडाली.
बस टाकळी घडेकर गावाचा गावात येत नसल्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर पायी टाकळी फाट्यावर यावे लागते व मलकापूर येथून दुपारी साडेतीन वाजताच परत येण्यासाठी बस असल्यामुळे शाळेच्या दोन तासिका सोडून त्यांना तीन वाजताच बसस्थानकावर यावे लागत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी सकाळी मलकापुर बस ची वेळ 8;30 ते 8;45 व सायंकाळी 5;15 वाजता करून बस टाकळी घडेकर गावापर्यंत करण्याची मागणी महिना भरापूर्वी निवेदनाद्वारे केली होती या वेळेत बदल न केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल पर्यायाने शिवसेनेला उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात होता.पावसाळ्यात बस गावातून पलटत नसल्याचे कारण बस चालकाने सांगितले असता दहा – पंधरा दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी स्वखर्चाने मुरुम टाकून जे.सि.बी द्वारे फैलावून दबाई केली मात्र बस टाकळी घडेकर गावात आली नाही व बसची सायंकाळची वेळ ही बदलविण्यात आली नसल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात विद्यार्थी, ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक यांचे कार्यालयात शाळा भरविली शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी केलेल्या या आंदोलनाच्या धास्तीने आज दुपारच्या बस ची वेळ बदलवून बस टाकळी घडेकर गावात जाणार असल्याचे आश्वासन प्रभारी आगार व्यवस्थापक देशमाने यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी, ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.यावेळी शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत,शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, माजी नगरसेवक पांडुरंग चिम,युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी,किसान सेना उपतालुकाप्रमुख विश्वनाथ पुरकर, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम, विभागप्रमुख चाॅद चव्हाण, विभागप्रमुख सत्तार शाह, शाखाप्रमुख रफीकभाई पजायेवाले, गजानन उंबरकर, गजानन बाम्हंदे,ज्ञानेश्वर इंगोले, विजय मुसळे,अमोल मुसळे, गजानन बाम्हंदे, गणेश बाम्हंदे, महादेव बाम्हंदे, राजेश घडेकर, प्रदीप बाम्हंदे विनोद बाम्हंदे, दिनकर गोडळेकर, संदीप बाम्हंदे, विक्रम बाम्हंदे,आनंद बाम्हंदे, ईश्वरी मुसळे, अंजली बाम्हंदे, गायत्री बाम्हंदे, आराध्या मुसळे,वैष्णवी बाम्हंदे, उपासना इंगोले, लावण्या बाम्हंदे,प्रेम बाम्हंदे, शुभम बाम्हंदे, समर्थ इंगळे, ओम बाम्हंदे,अर्णव बाम्हंदे,समर्थ घडेकर,चंचल मख ,निखिल जंगले, नंदिनी बाम्हंदे, आयर्न पाटील, दिनेश बाम्हंदे सह आदिंची उपस्थिती होती.
#image_title. प्रतिनिधी बुलढाणा : राष्ट्रवादीने नुकत्याच जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारिणीत अनेक निष्ठावान कार्यकत्यांना पदे देवून त्यांच्यात उत्साह भरण्याचे काम करण्यात आले आहे. सागवनचे सुनिल पांडुरंग सोनुने त्यापैकीच एक असून त्यांना बुलढाणा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने, विदर्भ प्रभारी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सुचनेवरून आणि जिल्हाध्यक्ष नरेश शेळके (दक्षीण विभाग) आणि प्रसेनजीत पाटील (उत्तर) यांनी सुनिल सोनुने यांची बुलढाणा तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास १५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असूनही एक सामाजिक नेतृत्व म्हणून सुनिल सोनुने यांची ओळख आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी समाजकारणाचा मार्ग निवडला, त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे ग्रामसेवा सहकारी सोसायटीमध्ये संचालक म्हणून ते निवडून आले. त्यांची पत्नी सौ. अर्चनाताई सागवन ग्रामपंचायतच्या सदस्या असून कृउबास बुलढाणा येथे संचालिका म्हणून कार्यरत आहे. इतर पक्षांकडून प्रवेशासाठी विविध आमिषे झिडकारून राष्ट्रवादीतच टिकून राहणाऱ्या सुनिल सोनुने यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा तालुक्यातील पक्ष संघटनेत उत्साह संचारला आहे. त्यांच्या चाहत्यांनी सदर निवडीचे जोरदार स्वागत केले आहे.
या निवडीबद्दल सोनुने यांनी डॉ. शिंगणे तसेच नरेश शेळके यांचे आभार मानले आहेत. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, ‘संघटनात्मक बांधणीवर जोर आणि गांव तिथे शाखा हा उपक्रम राबतविण्याला प्राथमिकता दिली जाईल. शरद पवार साहेबांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू तसेच बुलढाणा तालुक्यात राष्ट्रवादीला सर्वच बाबतीत आघाडीवर ठेवू’, या शब्दांत श्री सोनुने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन, सहाय्यक बीएलओची सक्ती रद्द करण्याची मागणी
मुंबई : सहाय्यक बीएलओ म्हणून अतिरिक्त काम करण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांवर लादण्यात आलेली अतिरिक्त जबाबदारी तातडीने मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
आंदोलनादरम्यान कृती समितीने सांगितले की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मानधनावर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांवर पूर्वप्राथमिक शिक्षण, बालकांचे पोषण व आरोग्य, वजन व उंची मोजणी, विविध सर्वेक्षणे, नवजात बालके व गर्भवती महिलांची नोंद, लसीकरण, गृहभेटी, टीएचआर वितरण तसेच मातृत्व वंदना योजनेसह अनेक जबाबदाऱ्या आधीपासूनच आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर सहाय्यक बीएलओचे अतिरिक्त काम लादणे अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला.
कृती समितीच्या प्रतिनिधींनी दावा केला की, अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्यास सेवा समाप्ती किंवा प्रशासकीय कारवाईची धमकी दिली जात असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य कामे देऊ नयेत, अशी भूमिका यापूर्वी स्पष्ट केली असल्याचेही आंदोलकांनी नमूद केले. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही कर्मचाऱ्यांच्या मूळ कामावर परिणाम करणारी अतिरिक्त कामे देण्याबाबत गंभीर निरीक्षणे नोंदविल्याची आठवण करून देण्यात आली.
यावेळी आशा सेविकांवर बीएलओचे पूर्णवेळ स्वरूपाचे काम लादू नये, अशी मागणी करण्यात आली. बीएलओच्या कामासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभारून बेरोजगार सुशिक्षित युवक-युवतींची नियुक्ती करावी, अशी मागणीही कृती समितीने शासनाकडे केली.
बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उकल केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली 1 लाख 5 हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस ठाणे करीत आहे.
जिल्ह्यात दाखल गंभीर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक करण्यासह चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांनी स्वतंत्र पथके तयार करून धाड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 273/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) नुसार नोंद असलेल्या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी मोंढाळा (ता. जि. बुलढाणा) येथील स्वप्नील नुदाराम वाघमारे (वय 19) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेली 1 लाख 5 हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यामुळे या गुन्ह्यातील मुद्देमालाची शंभर टक्के वसुली करण्यात पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी खंडू संतोषराव भोंडे (वय 37, रा. म्हसला बु., ता. जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 ते 16 जुलै 2026 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपातून 1 लाख 5 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक आशीष रोही यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गौरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम अघाव आणि युवराज राठोड यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
जौहर यूनिवर्सिटी ध्वस्तीकरण मामला: मौलाना महमूद मदनी ने जताई चिंता, उत्तर प्रदेश सरकार से आदेश पर पुनर्विचार की मांग
जमीयत उलमा-ए-हिंद के अध्यक्ष ने कहा— ‘बुलडोजर कार्रवाई अंतिम विकल्प नहीं’; छात्रों के भविष्य और कानूनी विकल्पों पर विचार करने की अपील
नई दिल्ली/रामपुर (दैनिक वायरल न्यूज लाइव ब्यूरो): जमीयत उलमा-ए-हिंद के अध्यक्ष मौलाना महमूद मदनी ने उत्तर प्रदेश के रामपुर स्थित मोहम्मद अली जौहर यूनिवर्सिटी की 38 इमारतों को गिराने के प्रशासनिक आदेश पर गंभीर चिंता व्यक्त की है। सोमवार, 20 जुलाई को जारी अपने बयान में उन्होंने राज्य सरकार से इस ध्वस्तीकरण आदेश पर तत्काल पुनर्विचार करने का अनुरोध किया। मदनी ने स्पष्ट किया कि यह मुद्दा कानून के शासन, प्राकृतिक न्याय (Natural Justice) और राज्य के संवैधानिक दायित्वों से जुड़ा एक बुनियादी प्रश्न खड़ा करता है।
छात्रों के भविष्य और राष्ट्रीय धरोहर का हवाला:
मौलाना महमूद मदनी ने कहा कि इस तरह के बड़े पैमाने पर ध्वस्तीकरण से विश्वविद्यालय में पढ़ रहे हजारों विद्यार्थियों का शैक्षणिक भविष्य अंधकार में पड़ जाएगा। इससे न केवल छात्रों के मौलिक अधिकारों पर प्रतिकूल प्रभाव पड़ेगा, बल्कि देश का एक महत्वपूर्ण शैक्षणिक संस्थान और राष्ट्रीय संपत्ति भी नष्ट हो जाएगी।
“ध्वस्तीकरण से हजारों छात्रों के मौलिक अधिकारों का हनन होगा। जौहर यूनिवर्सिटी एक महत्वपूर्ण शैक्षणिक संपत्ति है, जिसे बचाना आवश्यक है।” — मौलाना महमूद मदनी, अध्यक्ष (जमीयत उलमा-ए-हिंद)
कानूनी विकल्प: ध्वस्तीकरण ही एकमात्र समाधान नहीं:
मदनी ने कानूनी पहलुओं पर जोर देते हुए कहा कि यदि किसी निर्माण में टाउन प्लानिंग या बिल्डिंग रेगुलेशन के उल्लंघन की पुष्टि होती भी है, तब भी कानून के तहत ध्वस्तीकरण पहला या अनिवार्य उपाय नहीं होता है।
वैकल्पिक कानूनी समाधान: यदि कोई ढांचा शहर के मास्टर प्लान या स्वीकृत भूमि उपयोग (Land Use) का गंभीर उल्लंघन नहीं करता है, तो प्राधिकरण को संशोधित नक्शा पास करने, कंपाउंडिंग शुल्क (शमन शुल्क) लेने, विकास शुल्क वसूलने या अन्य वैधानिक जुर्माना लगाकर उसे नियमित (Regularise) करने पर विचार करना चाहिए।
न्यायिक मिसालों का संदर्भ: उन्होंने पूर्व में दिए गए अदालती फैसलों का हवाला दिया, जिसमें कानपुर के रूमा इंडस्ट्रियल एरिया स्थित एक इंजीनियरिंग कॉलेज के अलावा वाराणसी, झांसी और इलाहाबाद विकास प्राधिकरणों से जुड़े मामले शामिल हैं। इन सभी मामलों में अदालतों ने तत्काल ध्वस्तीकरण के बजाय नियमितीकरण और शमन शुल्क जैसे सुधारात्मक उपायों को प्राथमिकता दी थी।
रामपुर विकास प्राधिकरण (RDA) का तर्क है कि आजम खान द्वारा स्थापित इस विश्वविद्यालय की अधिकांश इमारतें बिना अनुमति के बनाई गईं। दूसरी ओर, विश्वविद्यालय प्रबंधन का कहना था कि जब इन इमारतों का निर्माण हुआ था, तब संबंधित क्षेत्र आरडीए के अधिकार क्षेत्र में नहीं आता था। हालांकि, विकास प्राधिकरण ने इस तर्क को खारिज कर दिया।
निष्कर्ष:
मौलाना महमूद मदनी ने उत्तर प्रदेश सरकार से अपील की है कि वह छात्रों के हित और राष्ट्रीय शैक्षणिक परिसंपत्ति की सुरक्षा को ध्यान में रखते हुए कानून के दायरे में उपलब्ध वैकल्पिक रास्तों को प्राथमिकता दे। इस विवाद में शैक्षणिक संस्थानों के संरक्षण और प्रशासनिक नियमों के अनुपालन के बीच संतुलन बनाना आवश्यक है।
डिस्क्लेमर: यह मामला वर्तमान में प्रशासनिक और कानूनी प्रक्रियाओं के अधीन है। मामले में न्यायालयी याचिकाओं या सरकारी आदेशों से संबंधित नए अपडेट आ सकते हैं।
प्रतिनिधी बुलडाणा ; कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक भूषण गावंडे,ठाणेदार चिखली यांनी स्वप्निल उर्फ संपत गजानन काकफळे वय 25 वर्ष याचा MPDA प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी महोदय बुलढाणा यांना सादर केला होता. सदर प्रस्तावावरून मा. जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांच्या आदेशानुसार आज दि. 18 जुलै 2026 रोजी स्वप्नील काकफळे यास एक वर्षासाठी बुलडाणा जिल्हा कारागृह, येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदर इसमाविरुद्ध दुखापत करणे, जीवघेणा हल्ला, चोरी, रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणे, गांजा सेवन करून सार्वजनिक शांतता भंग करणे, जुगार खेळविणे, गर्दीचा फायदा घेऊन चोरीचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक वर्तनामुळे चिखली शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याशिवाय साहिल राजेंद्र शिंगणे व अनिकेत शाम श्रीमंत या दोघांविरुद्धही महा. पोलीस कायदा कलम 56 नुसार प्रस्ताव तयार करून सादर केला असता त्यांना तीन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
ही कारवाई मा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मा अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या पोलीस अंमलदार अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर,राहुल पायघन ज्ञानेश्वर शिंदे तसेच संजय भुजबळ स्था.गु.शा बुलडाणा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
चिखली पोलिसांनी भविष्यातही सराईत गुन्हेगार व समाजकंटकांविरुद्ध अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.
उदयनगर : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ११ ते १८ जुलै दरम्यान साजऱ्या होत असलेल्या लोकसंख्या स्थिरता सप्ताहाची सुरुवात शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उदयनगर येथे विविध जनजागृती उपक्रमांनी झाली. राज्य कुटुंब कल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य “दोन जन्मात अंतर, कुटुंब सुखी निरंतर” असे असून, कुटुंब नियोजनाचा स्वीकार करून निरोगी माता, सुदृढ बालक आणि सशक्त कुटुंब घडविण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील खंडागळे यांनी उपस्थित नागरिकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व, लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना, दोन अपत्यांमधील योग्य अंतराचे फायदे तसेच माता-बाल आरोग्य संवर्धनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत कुटुंब नियोजन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांनीही नागरिकांचे समुपदेशन करून विविध गर्भनिरोधक साधनांची माहिती दिली.
सप्ताहानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात कंडोम (निरोध), ‘माला-एन’ व ‘छाया’ गर्भनिरोधक गोळ्या, ‘अंतरा’ गर्भनिरोधक इंजेक्शन, कॉपर-टी तसेच प्रसूतीपश्चात कॉपर-टी या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच इच्छुक दाम्पत्यांसाठी स्त्री नसबंदी व पुरुष विनाटाका नसबंदी शस्त्रक्रियेसाठी नोंदणी व नियोजनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार लाभार्थींना प्रोत्साहनपर आर्थिक लाभही देण्यात येणार आहे.याशिवाय गरोदर मातांची एएनसी तपासणी, रक्तदाब, वजन, हिमोग्लोबिन तपासणी, लोह व फॉलिक ॲसिड गोळ्यांचे मोफत वितरण तसेच बालकांचे नियमित लसीकरण सुरू असून, गृहभेटी, माहितीपत्रकांचे वितरण, समुपदेशन शिबिरे, जनजागृती रॅली आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातूनही लोकसंख्या स्थिरता व कुटुंब नियोजनाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
डॉ. खंडागळे यांनी प्रत्येक नागरिकाने छोट्या, सुजाण व निरोगी कुटुंबाची संकल्पना स्वीकारून लोकसंख्या स्थिरतेच्या राष्ट्रीय अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. यावेळी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदयनगर : सहाय्यक संचालक, हिवताप व हत्तीरोग, अकोला डॉ. अन्सारी यांनी मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (एडीएमओ) होगे यांच्या समवेत शनिवार दि.११ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, उदयनगर येथे आकस्मिक भेट देऊन विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान डॉ. अन्सारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती घेतली. कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.यानंतर त्यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन सूक्ष्मदर्शकाद्वारे करण्यात येणाऱ्या तपासणी प्रक्रियेची पाहणी केली. तसेच प्रयोगशाळेतील विविध नोंदींची तपासणी केली. गप्पी मासे पैदास केंद्रालाही त्यांनी भेट देऊन डास नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील खंडागळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भातील माहिती सादर केली व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
अमडापूर : अमडापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने आज दि.९ जुलै रोजी डोंगरशेवली शिवारातील दरी-खोऱ्यात जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व साहित्य जप्त करून नष्ट केले.
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेदार जयसिंग राजपूत यांनी पथकासह घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत रेखाबाई सुनील पवार व मंगलाबाई गणेश पवार (रा. डोंगरखंडाळा, ता. चिखली) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.
रेखाबाई पवार हिच्याकडून १४ लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत ६०० रुपये) तसेच ३,४३० रुपयांचा इतर मुद्देमाल, तर मंगलाबाई पवार हिच्याकडून १४ लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत ७०० रुपये) व ३,६५० रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी आढळून आलेली हातभट्टी दारू व सडवा नष्ट करण्यात आला.ही कारवाई ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) निवृत्ती चेके, पोलीस हवालदार बिलगे, पोलीस शिपाई चंद्रशेखर मुरडकर, दुर्गासिंग ठाकूर, रंजीत सरोदे, चालक चिंचोले तसेच महिला पोलीस अंमलदार वैशाली आराख यांनी पार पाडली.
या प्रकरणी दोन्ही महिला आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ASI निवृत्ती चेके करीत आहेत.
सर सय्यद अहमद खान उर्दू ज्युनिअर कॉलेज, अमडापूर येथे केंद्र प्रमुख जमीर रजा यांच्या हस्ते वितरण; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
उदयनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मानव विकास योजनेअंतर्गत सर सय्यद अहमद खान उर्दू ज्युनिअर कॉलेज, अमडापूर येथे ४२ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. केंद्र प्रमुख जमीर रजा यांच्या हस्ते हा वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी सैफुल्ला सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थींना सायकलींचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शाळेत ये-जा करण्याचा प्रवास अधिक सोयीचा होणार असून त्यांच्या शिक्षणाला चालना मिळणार आहे.
कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष शेख आजम, प्राचार्य शेख जफर पटेल,प्रा. रिजवानुल्लाह खान, प्रा. म.आबिद,प्रा. मो. मोईन अख्तर, प्रा.शोएब उल्लाह खान, प्रा.मोहम्मद रहेमान, प्रा.सोहेल खान तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोहम्मद तौफिक, मोहम्मद समीर आणि शेख जव्वाद दानिश उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. सायकली मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत शिक्षणात सातत्य, शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
मलकापूर, दि. ३ जुलै : मलकापूर येथील सखल मुस्लिम समाजाच्या वतीने राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवून भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नाजिया इलाही यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नाजिया इलाही यांनी विविध माध्यमांमधून तसेच मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये इस्लाम धर्म, हजरत मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आणि उम्मुल मोमिनीन हजरत आयशा (रजि.) यांच्या संदर्भात आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून समाजात द्वेष, तणाव आणि तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा तसेच धार्मिक श्रद्धांचा सन्मान राखण्याचा अधिकार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही धर्माबाबत किंवा धर्मगुरूंबाबत अपमानास्पद वक्तव्ये करणे हे सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेस बाधक ठरू शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीने कायद्याचे उल्लंघन केले असल्यास त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सखल मुस्लिम समाज, मलकापूर यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जि.प.उर्दू शाळा ते शेख उस्मान यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याची मागणी; ५० नागरिकांचे ग्रामपंचायतीला निवेद
पावसाळ्यात चिखलामुळे विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास; विशेष बाब म्हणून रस्ता मंजूर करण्याची मागणी
उदयनगर : उदयनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषद उर्दू शाळा ते शेख उस्मान शेख रहेमान यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता तातडीने मंजूर करून बांधण्यात यावा, अशी मागणी वार्ड क्रमांक १, २ व ३ मधील नागरिकांनी आज दि.३० जून रोजी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद उर्दू शाळेत सुमारे ३०० विद्यार्थ्यांची पटसंख्या असून शाळेत ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा नागरिक व विद्यार्थी घसरून पडल्याने जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता व नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण विशेष बाब म्हणून तात्काळ मंजूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर शेख रफिक, शेख बशीर, जावेद खान, यास्मिन बी, शेख अख्तर यांच्यासह वार्ड क्रमांक १, २ व ३ मधील सुमारे ५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन सादर करताना माजी सरपंच प्रदीप अंभोरे, पुरुषोत्तम अवचार, राधेश्याम ठाकरे, अनिल अंभोरे, शेख इल्यास, सलीम भाई आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन संबंधित रस्त्याचे काम तातडीने मंजूर करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पैगंबर हजरत मोहम्मद यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी नाझिया इलाही खानविरुद्ध कारवाईची मागणी
सायबर चौकशी करून बीएनएस कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी सकल मुस्लिम समाजाचे अमडापूर पोलिसांना निवेदन
उदयनगर : सोशल मीडियावरील एका युट्युब पॉडकास्टमध्ये इस्लाम धर्म, पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) तसेच हजरत आयशा (र.अ.) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत नाझिया इलाही खान याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उदयनगर येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवार दि. २६ अमडापूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी एका युट्युब पॉडकास्टमधील कथित वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली. या कथित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला असून, समाजात तेढ, वैमनस्य निर्माण होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सकल मुस्लिम समाजाने या प्रकरणाची सायबर सेलमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित व्हिडिओ, ऑडिओ तसेच अन्य डिजिटल पुराव्यांची तपासणी करून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २९९ तसेच लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार तात्काळ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर मुजम्मिल खान, रेहान खान, सय्यद रेहान, शेख इलियास, नदीम अन्सारी, चांद खान यांच्यासह सकल मुस्लिम समाजातील अनेक युवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने वाले कथित बयानों के विरोध में AIMIM का बुलढाणा में प्रदर्शन, पुतला दहन कर की कानूनी कार्रवाई की मांग
बुलढाणा, 26 जून। ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) बुलढाणा जिला इकाई की ओर से शुक्रवार को जिजा माता स्टेडियम, बुलढाणा में कथित तौर पर धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने वाले बयानों के विरोध में प्रदर्शन किया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने विरोध स्वरूप पुतला दहन कर संबंधित मामले में कानूनी कार्रवाई की मांग की। कार्यक्रम में बड़ी संख्या में पार्टी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित रहे।
कार्यक्रम में AIMIM बुलढाणा जिला अध्यक्ष दानिश शेख ने विशेष रूप से संबोधित करते हुए कहा कि धार्मिक मामलों में सभी पक्षों को जिम्मेदारी और आपसी सम्मान बनाए रखना चाहिए। उन्होंने कहा कि किसी भी प्रकार के विवाद का समाधान कानून और लोकतांत्रिक प्रक्रिया के माध्यम से ही किया जाना चाहिए तथा समाज में शांति और सौहार्द बनाए रखना सभी की जिम्मेदारी है।
सभा को संबोधित करते हुए वक्ताओं ने संबंधित मामले में निष्पक्ष एवं कानूनी कार्रवाई की मांग की। उन्होंने कहा कि समाज में अमन, भाईचारा और सामाजिक सद्भाव कायम रखना समय की आवश्यकता है तथा किसी भी प्रकार के भड़काऊ या विवादित बयान से बचना चाहिए।
कार्यक्रम के दौरान मोहर्रम के पवित्र महीने का भी उल्लेख किया गया। वक्ताओं ने कहा कि मोहर्रम सब्र, कुर्बानी, इंसाफ और इंसानियत का पैगाम देता है तथा समाज को शांति, एकता और आपसी भाईचारे के साथ आगे बढ़ने की प्रेरणा प्रदान करता है।
इस अवसर पर AIMIM बुलढाणा जिला अध्यक्ष दानिश शेख, युवा जिलाध्यक्ष आमेर सोहेल, नगरसेवक प्रतिनिधि सिद्दिक शाह, नगरसेविका प्रतिनिधि जहीर भाई, जलगांव जामोद शहर अध्यक्ष समीर आर्यन, खामगांव शहर अध्यक्ष आरीफ पहलवान, मोतला तालुका अध्यक्ष आरिफ खान पठान, नांदुरा तालुका अध्यक्ष सैयद मंजूर, खामगांव तालुका अध्यक्ष अब्दुल्ला भाई, अब्दुल रहमान, पत्रकार आसीफ खान, शेख रेहान, बिलाल, तौफीक लिडर सहित AIMIM के अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे।
पत्रकारों का अपमान बर्दाश्त नहीं किया जाएगा; सांसद संजय दिना पाटिल के बयान की वॉइस ऑफ मीडिया ने की कड़ी निंदा
मुंबई, 25 जून। शिवसेना (शिंदे गुट) के सांसद संजय दिना पाटिल द्वारा एक पत्रकार के संबंध में कथित रूप से की गई अपमानजनक टिप्पणी की वॉइस ऑफ मीडिया – इंटरनेशनल फोरम ने कड़ी निंदा की है। संगठन ने इस मामले में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को विस्तृत ज्ञापन भेजकर तत्काल हस्तक्षेप की मांग की है।
वॉइस ऑफ मीडिया – इंटरनेशनल फोरम के संस्थापक एवं अंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काले के हस्ताक्षर से भेजे गए ज्ञापन में कहा गया है कि पत्रकार लोकतंत्र के चौथे स्तंभ हैं तथा शासन, प्रशासन और जनता के बीच संवाद का महत्वपूर्ण माध्यम हैं। ऐसे में जनप्रतिनिधियों द्वारा पत्रकारों के प्रति अपमानजनक भाषा का उपयोग किया जाना अत्यंत गंभीर विषय है और यह लोकतांत्रिक मूल्यों के अनुरूप नहीं है।
ज्ञापन में आगे कहा गया है कि पत्रकारों को प्रश्न पूछने, जानकारी प्राप्त करने और जनता के सामने सत्य प्रस्तुत करने का संवैधानिक अधिकार प्राप्त है। पत्रकार जब अपनी व्यावसायिक जिम्मेदारियों का निर्वहन कर रहे हों, तब उनके प्रति अपमानजनक शब्दों का प्रयोग करना या उन्हें निशाना बनाना स्वतंत्र और निष्पक्ष पत्रकारिता के वातावरण के लिए हानिकारक हो सकता है।
संगठन ने अपने निवेदन में कहा है कि किसी समाचार या प्रश्न को लेकर मतभेद हो सकते हैं, लेकिन इसके आधार पर पत्रकारों का अपमान करना अथवा उनकी प्रतिष्ठा को ठेस पहुंचाने का प्रयास किसी भी लोकतांत्रिक व्यवस्था में स्वीकार्य नहीं है। इस प्रकार की टिप्पणियों से पत्रकारों की सुरक्षा को लेकर चिंताएं बढ़ सकती हैं तथा समाज में पत्रकारों के प्रति गलत संदेश जा सकता है।
वॉइस ऑफ मीडिया ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मांग की है कि वे इस मामले को गंभीरता से लेते हुए संबंधित सांसद से सार्वजनिक रूप से खेद व्यक्त करने के लिए कहें तथा पत्रकारों के सम्मान और सुरक्षा को सुनिश्चित करने के लिए राज्य सरकार स्पष्ट और ठोस रुख अपनाए।
संदीप काले ने कहा कि महाराष्ट्र को प्रगतिशील विचारधारा और अभिव्यक्ति की स्वतंत्रता की समृद्ध परंपरा प्राप्त है। पत्रकारिता का सम्मान बनाए रखना लोकतंत्र की मूलभूत आवश्यकता है। पत्रकारों के खिलाफ होने वाले मौखिक हमलों, धमकियों और अपमानजनक व्यवहार के विरुद्ध सभी स्तरों पर दृढ़ता से खड़े होने की आवश्यकता है।
इस बीच, संगठन की ओर से जानकारी दी गई कि ज्ञापन की प्रतियां राज्य सरकार के वरिष्ठ अधिकारियों, सूचना एवं जनसंपर्क महासंचालनालय, पुलिस महानिदेशक तथा संबंधित राजनीतिक दल के नेतृत्व को भी भेजी गई हैं।
पत्रकारों के सम्मान, सुरक्षा और अभिव्यक्ति की स्वतंत्रता को अक्षुण्ण बनाए रखने के लिए राज्य सरकार इस मामले में शीघ्र और प्रभावी कदम उठाए, ऐसी अपेक्षा विभिन्न पत्रकार संगठनों द्वारा व्यक्त की जा रही है।
देऊळगाव राजा परिसरातील कांदा बियाणे चोरी प्रकरण उघडकीस; ५.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटकेत
बुलढाणा, दि. १४ जून : देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अथर्व सीड्स कंपनीच्या कांदा बियाण्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५ क्विंटल ३६ किलो कांदा बियाणे, दोन दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील भाजीमंडी परिसरातील रहिवासी मोहम्मद अजहर मोहम्मद कलंदर (वय ३६) यांनी २ जून २०२६ रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, २४ मे २०२६ रोजी रात्री ते २५ मे २०२६ रोजी पहाटेदरम्यान सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर येथील जुब्बुजी मायोमास ब्रिकेट इंडस्ट्री कंपनीमध्ये प्रक्रिया करण्यासाठी आणलेले अथर्व सीड्स कंपनीचे १४ पोते कांदा बियाणे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. चोरीस गेलेल्या बियाण्यांचे वजन सुमारे ६ क्विंटल ६५ किलो असून त्यांची किंमत ४ लाख ६५ हजार ५०० रुपये होती.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५९/२०२६ दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेला गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत शोधमोहीम राबविली.
तपासादरम्यान अंकुश तेजराव खंडारे (वय ४०, रा. सातेगाव, ता. जाफराबाद, जि. जालना), विनोद विठ्ठल काळे (वय २९, रा. लोणगाव, ता. भोकरदन, जि. जालना) आणि भानुदास उर्फ राहुल बाबूराव गायकवाड (वय ३२, मूळ रा. देऊळगाव राजा, सध्या भारस्करवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून ५ क्विंटल ३६ किलो कांदा बियाणे, युनिकॉर्न कंपनीची एक दुचाकी, शाइन कंपनीची एक दुचाकी तसेच तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख २१ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे आशीष रोही, प्रताप बाजाड, शरद गिरी, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, मनोज खारदे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजू अडवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.