जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला; आ. चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

Advertisement

मुक्ताईनगर | मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत विजयानंतर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “मुक्ताईनगर शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठीच नागरिकांनी विकासाच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे,” असे सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले.

या निवडणुकीच्या निकालातून जनतेने नकारात्मक राजकारणाला नाकारून विकासाला पसंती दिल्याचे स्पष्ट होते, असे आमदार पाटील यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व नागरी सोयी-सुविधांच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांना जनतेने पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, “केवळ आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांना जनतेने योग्य जागा दाखवली आहे. आता मुक्ताईनगरचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा असून, निवडणुकीतील हा कौल विकासाच्या कामांना नवी दिशा देणारा ठरेल.”

दरम्यान, या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. आगामी काळात नागरिकांच्या अपेक्षांवर खरा उतरून मुक्ताईनगरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वासही आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Subscribe to Viral News Live