Friday, November 21, 2025
Home Blog Page 5

श्रीक्षेत्र मुक्ताईनगरात भाविकांची कार्तिक वारी —संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर

श्रीक्षेत्र मुक्ताईनगरात भाविकांची कार्तिक वारी —संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर

श्रीक्षेत्र मुक्ताईनगरात भाविकांची कार्तिक वारी —संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर

श्रीक्षेत्र मुक्ताईनगरात भाविकांची कार्तिक वारी —संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर

   संदीप जोगी… मुक्ताईनगर —–
प्रबोधिनी भागवत एकादशी व कार्तिकी वारी पंढरपूर निमित्त दि. ०२ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर (जि. जळगांव) येथील श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधीस्थळ मुळमंदिर येथे , मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिरात  भक्तीचा महासागर उसळला. हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धा-भावाने आईसाहेब संत मुक्ताईंचे दर्शन घेतले.
जे भाविक कार्तिकी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, त्यांनी “संतांचे दर्शन म्हणजे देवाचे दर्शन” आणि “संतांची वारी म्हणजे देवाची वारी” या भावनेने श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे येऊन आईसाहेबांचे दर्शन घेत आपली कार्तिक वारी पूर्ण केली.
पहाटे श्रीकृष्ण हरि पाटील (कोथळी) यांच्या हस्ते आईसाहेब संत मुक्ताईंचा अभिषेक व महापूजा पार पडली. भाविकांसाठी श्रीकृष्ण हरि पाटील (कोथळी) व दिनकर महाजन (बंबाडा) यांच्या वतीने एकादशीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले.
दिवसभर नामस्मरण, अभंगगायन व भक्तीगीतांनी परिसर दुमदुमून गेला. भाविकांच्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते. संतपरंपरेचा आणि भक्तीचा संगम झालेल्या या प्रसंगाने श्रीक्षेत्र मुक्ताईनगर खऱ्या अर्थाने “लघुपंढरपूर” बनले.

मिशन परिवर्तनची प्रभावी मोहीम : जळगांव जामोद हद्दीत पाच किलोहून अधिक गांजा जप्त; एक इसम अटकेत

मिशन परिवर्तनची प्रभावी मोहीम : जळगांव जामोद हद्दीत पाच किलोहून अधिक गांजा जप्त; एक इसम अटकेत

बुलढाणा जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगांव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची मोठी कारवाई केली. मिशन परिवर्तन अंतर्गत करण्यात आलेल्या या तपासात पोलिसांनी एका इसमाला पकडत त्याच्या ताब्यातून पाच किलो बहेचाळीस ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल असा एकूण एक लाख दहा हजार आठशे चाळीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी पोनि सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जळगांव जामोद परिसरात गस्त करीत असताना ग्राम पळशी फाटा येथे संशयास्पद हालचाली करणारा एक इसम दिसला. स्टाफने त्याला थांबवून त्याच्या हातातील थैलीची झडती घेतली असता त्यात अवैध गांजा सापडला. सदर इसम अवैध अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन जळगांव जामोद यांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अक्षय तेजराव कोकाटे, वय 32 वर्षे, रा. पळशी सुपो, ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा असे आहे. त्याच्या ताब्यातून पाच किलो बहेचाळीस ग्रॅम गांजा, किंमत एक लाख आठशे चाळीस रुपये, तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण एक लाख दहा हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यात 26 जून 2025 पासून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी मिशन परिवर्तनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई एसपी निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तर अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगांव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोनि सुनिल अंबुलकर, पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, राजेंद्र टेकाळे, शेख चांद, गणेश पाटील, पोकॉ गजानन गोरले, चापोना सुरेश भिसे, निवृत्ती पुंड तसेच पोहेकॉ राजु आडवे यांच्या तांत्रिक विभागाच्या मदतीचा समावेश होता.

शेती औजारे चोरी प्रकरण उकल; आरोपी दोघे जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

शेती औजारे चोरी प्रकरण उकल; आरोपी दोघे जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील शेती औजारे व शेतीमाल चोरी प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत, स्थानिक गुन्हे शाखेने अंढेरा पोलीस ठाणे हद्दीतील दोन स्वतंत्र गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या तपासात दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे सहा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान, पोनि. सुनिल अंबुलकर यांनी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करून चोरी प्रकरणांमधील आरोपींचा शोध घेण्यास सूचना दिल्या होत्या. पथकांनी सखोल माहिती गोळा करून दि. 31 ऑक्टोबर रोजी दोन्ही प्रकरणांची उकल साधली. अटक केलेल्या आरोपींकडे चोरीस गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली, रोटावेटर तसेच ट्रॅक्टर असा एकूण सहा लाख नव्वद हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अंढेरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

प्रकरणाची हकीकत

दि. 2 ऑक्टोबर 2025 रोजी पवन शिवदास चेके, रा. सरंबा यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती की त्यांच्या शेतातून शेंदऱ्या रंगाची ट्रॉली चोरून नेण्यात आली आहे. या प्रकरणी अप.क्र. 281/2025 नोंद आहे. तसेच दि. 13 जून 2025 रोजी विकास संपत चेके यांच्या गोठ्यातून रोटावेटर चोरीला गेले होते, ज्याबाबत अप.क्र. 170/2025 प्रमाणे गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही प्रकरणांचा समांतर तपास करून आरोपींचा शोध लावला.

अटक आरोपी

  1. गणेश आत्माराम वायाळ, वय 38 वर्षे, रा. सावरखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना
  2. अमोल सुरेश शेवत्रे, वय 33 वर्षे, रा. ब्रम्हपुरी, ता. जाफ्राबाद, जि. जालना

अटक दिनांक : 31 ऑक्टोबर 2025

जप्त मुद्देमाल

  • ट्रॅक्टर ट्रॉली : किंमत 75,000 रुपये
  • रोटावेटर : किंमत 65,000 रुपये
  • ट्रॅक्टर : किंमत 5,50,000 रुपये
    एकूण जप्त मालकिंमत : 6,90,000 रुपये

मार्गदर्शन व कामगिरी पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने तर अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली ASI ओमप्रकाश सावळे, दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, दीपक वायाळ, मनोज खरडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील कैलास ठोंबरे यांनी मोलाची भूमिका बजावली.

भोटा येथे शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार

भोटा येथे शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार

भोटा (ता. मुक्ताईनगर) :
(अतिक खान)
“अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याच्या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या भव्य सोहळ्याचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री. चंद्रकांतभाऊ पाटील साहेब यांनी भूषवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमचे मित्र मा. श्री. पंकजभाऊ पांडव यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनोदभाऊ तराळ, समाधानभाऊ महाजन, आनंदभाऊ पाटील, छोटूभाऊ भोई, अफसरभाऊ खान, रघुनाथभाऊ पाटील, हितेशभाऊ पाटील, पंकजभाऊ कोळी, प्रवीणभाऊ चौधरी, पंकजभाऊ पांडव आदी मान्यवर उपस्थित होते.
कुऱ्हा-वडोदा परिसरासह मुक्ताईनगर तालुक्यातील असंख्य शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी या ऐतिहासिक व पावन सोहळ्याला उत्स्फूर्त उपस्थिती लावली. उपस्थित शिवभक्तांनी “जय जिजाऊ, जय शिवराय” च्या घोषणांनी वातावरण दणाणून टाकले.
या प्रसंगी सहभागी सर्व मान्यवर, शिवप्रेमी आणि ग्रामस्थांचे भोटा ग्रामस्थ व शिवस्मारक समिती तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

कोलते महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस यानिमित्त यूनिटी मार्च कार्यक्रम उत्साहात साजरा

कोलते महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस यानिमित्त  यूनिटी मार्च  कार्यक्रम उत्साहात साजरा

कोलते महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस यानिमित्त  यूनिटी मार्च  कार्यक्रम उत्साहात साजरा
मलकापूर :पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालय परिसरात विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच देशभक्तीपर घोषणा देत या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करणारे भाषण आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषवाक्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सरदार पटेल यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, “देशातील विविध प्रांत, संस्कृती आणि समाजघटकांना एका धाग्यात ओवण्याचे कार्य सरदार पटेल यांनी केले. त्यांच्या नेतृत्वगुणांमधून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी.”
कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे व आय क्यू ए सी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी यांनी केले. या दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना आणि जबाबदारीची जाणीव रुजविण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मलकापूर शहरातील जनता कला वाणिज्य महाविद्यालयाच्या परिसरात एकतेची शपथ घेतली व युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय  यांच्या माय भारत या अभियानांतर्गत मलकापूर येथे  युनिटी मार्च रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यामध्येमाननीय केंद्रीय मंत्री  रक्षा ताई खडसे, माननीय आमदार चैनसुख  संचेती,  माननीय प्रणित सांगवीकर जिल्हा युवा अधिकारी यांचा पण सहभाग होता.
कोलते महाविद्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापकवर्गातील प्रा. सदाशिव लवंगे, प्रा. मधुकर टेकाडे, प्रा. राजेश सरोदे, प्रा. प्रवीण  पाटील, प्रा. निलेश बुडूखले, प्रा. निलेश बुंधे, प्रा. अंकुश नारखेडे, प्रा. पांडुरंग चोपडे, प्रा. कैलास कोळी तसेच प्राध्यापिका संगीता खर्चे, तेजल खर्चे, भाग्यश्री नारखेडे, प्रा. ख्याती चौधरी, प्रा. चैताली नारखेडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशाच्या ऐक्य, अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणाची शपथ घेतली. महाविद्यालय परिसर देशभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर, घोषवाक्ये आणि देशभक्तीपर संदेशांनी वातावरण अधिक प्रेरणादायी बनले.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय गीताने समारोप झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, समाजबंध आणि लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी एन एस एस स्वयंसेवक, प्राध्यापकवर्ग आणि प्रशासनाचे सहकार्य लाभले.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त बुलढाणा पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटीचा उत्साहपूर्ण उपक्रम

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त बुलढाणा पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटीचा उत्साहपूर्ण उपक्रम
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त बुलढाणा पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटीचा उत्साहपूर्ण उपक्रम

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त बुलढाणा पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटीचा उत्साहपूर्ण उपक्रम

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधत बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सात वाजता जिल्ह्यातील सर्व तेहतीस पोलीस स्टेशन तसेच पोलीस मुख्यालय येथे रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी सर्व पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली. या निमित्ताने एकता, अखंडता आणि सुरक्षिततेची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मार्गदर्शन करत राष्ट्रभावना दृढ करण्याचे आवाहन केले. बँड पथकाने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. त्यानंतर रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटी या उपक्रमांना प्रारंभ झाला. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत हा उपक्रम सुरक्षित मार्गाने आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेत यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये पुरुष गटात अजय नरोटे, सुरज गवई आणि रणजीत राठोड यांचा सन्मान करण्यात आला. महिला गटात प्रगती राऊत, मृणाल पडोळसे आणि कृष्णाली देशपांडे तर पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील दिलीप तिडके, अजाबराव आखरे आणि सुरेश शिंबरे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सम्यक जैन, सिध्दी सोनोने आणि अनिता कापरे यांना प्रोत्साहनपर ट्रॉफी देण्यात आल्या.

संपूर्ण कार्यक्रम पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, प्र. पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण पावरा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक काकिवपुरे, राखीव पोलीस निरीक्षक दिलीप तिडके आणि सपोनि दिपक ढोमणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.

या कार्यक्रमात जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी, गृहरक्षक दल, एनसीसी कॅडेट, एनएसएस विद्यार्थी, विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, आरोग्यविषयक जागृती करणाऱ्या क्लबचे सदस्य, व्यापारी संघटना, पत्रकार संघटना तसेच विविध प्रशासकीय विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. राष्ट्रीय एकता दिवसाच्या शपथेसह एकात्मतेचा संदेश देत रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटी हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश रत्नपारखी यांनी केले.

विवरा येथील अतिवृष्टीतांना अनुदान मिळण्यासाठी शिवसेना (उबाठा)चा तहसील कार्यालयासमोर डफडे बजाओ

vivara-ativrushit-piditanna-anudan-milava-shivsena-ubatha-dafde-bajao
मलकापुर:-‘ तालुक्यातील ग्राम विवरा  येथे गत महिन्यात 26 सप्टेंबर 25 रोजी ढगफुटी होवून अतिवृष्टी  झाली त्यामध्ये शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांच्या घराचे अतोनात नुकसान झाले त्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पालकमंत्री सावकारे,आमदार  चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे,तहसीलदार राहुल तायडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. मंत्री महोदयांनी विवरा येथील शेतकरी, रहिवासी ग्रामस्थांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला होता मात्र महिना उलटून सुद्धा  अद्यापही विवरा येथील शेतकऱ्यांना व रहिवासी ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आज दि.31 ऑक्टोबर 25 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना (उबाठा) चे वतीने तहसील कार्यालयासमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले, तसेच आठ दिवसात पैसे न मिळाल्यास यापेक्षा त्रीव आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांनी दिला या डफडे बजाओ आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख हरीदास गंणबास,उपशहर प्रमुख शकील जमादार, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी,अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम, विश्वनाथ पुरकर, दिपक कोथळकर,विभाग प्रमुख चांद चव्हाण, किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेंहेंगे,राजु नेवे,पद्माकर लांडे, बंडू पाटील, श्रीकृष्ण चोपडे, रघुनाथ सोनवणे, हरी तळेकर, मधुकर कडू, चंद्रभागा मोरे, कमल शिंदे, बाळू चोपडे, योगेश बिल, लहू सोनवणे, दिलीप वराडे, कैलास घुले, दामोदर पाटील, रमेश चौधरी, रहीम भाई बागवान,सह आदिंची उपस्थिती होती. डफडे बजाओ आंदोलनानंतर नायब तहसीलदार चौधरी यांना निवेदन देऊन आठ दिवसात अतीवृष्टी धारक शेतकरी व ग्रामस्थांना अनुदान देण्यात यावे अन्यथा या पेक्षा ही उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना(उबाठा) पदाधिकाऱ्यांनी दिला आहे

पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई मुक्ताईनगर तहसीलदारांची प्रभावी मोहीम; बुलढाणा जिल्ह्यातील चार डंपर जप्त

पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई मुक्ताईनगर तहसीलदारांची प्रभावी मोहीम; बुलढाणा जिल्ह्यातील चार डंपर जप्त
(प्रतिनिधी : अतिक खान, मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार गिरीश वखारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक मोहिमेत बुलढाणा जिल्ह्यातील चार डंपर जप्त करण्यात आले असून, या कारवाईनंतर वाळूमाफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
तहसीलदार वखारे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) सकाळी महसूल पथकाने कुऱ्हा-मलकापूर रस्त्यावरील धुपेश्वरजवळील पुलाजवळ आणि पिंप्राळा शिवारात तपासणी केली. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. महसूल पथक दिसताच डंपर चालक वाहने सोडून पसार झाले.
महसूल विभागाने तत्काळ कारवाई करत चार डंपर ताब्यात घेतले. जप्त केलेली वाहने मलकापूर तालुक्यातील असल्याचे समजते. कारवाईदरम्यान परिसरात बघ्यांची व वाळू तस्करांची मोठी गर्दी जमली होती. महसूल अधिकारी पोकॉ सागर सावे, अंकुश बावस्कर, सुनील मोरे आणि मंगेश सुरळकर यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईनंतर तहसीलदार गिरीश वखारे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “अवैध वाळू वाहतुकीवर सतत कारवाई करण्यात येईल. तसेच अशा वाहतुकीसाठी शेतातून रस्ता देणाऱ्या शेतकऱ्यांवर बोजा टाकण्यात येईल, आणि ज्या जमिनीवर आधीच बोजा आहे त्या सरकारजमा केल्या जातील.”
त्यांच्या या कडक भूमिकेमुळे वाळूमाफिया हादरले असून, या कारवाईचे स्थानिक जनतेतून स्वागत होत आहे. नागरिकांनी प्रशासनाला कुऱ्हा, थेरोळा, रिगाव, पिंप्राळा, कोहाळा, बोदवड आणि काकोडा गावांमधील अनधिकृत वाळू साठ्यांवर आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाळू तस्करीवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
थेरोळा शिवारात रात्रीच्या वेळी वाढलेल्या वाळू तस्करीमुळे शेतरस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. चालक बहुतेक अल्पवयीन व नशेत असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडी ची मुक्ताईनगर विधानसभा आढावा बैठक उत्साहात संपन्न

वंचित बहुजन आघाडी ची मुक्ताईनगर विधानसभा आढावा बैठक उत्साहात संपन्न
(अतिक खान मुक्ताईनगर)
आज दिनांक 30 आक्टोंबर 2025 रोजी प्रशिक नगर मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष : व बहुजन ह्रदय सम्राट,ॲड : श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ( साहेब )  यांच्या आदेशा नुसार तथा वंचित बहुजन आघाडीच्या विद्यमान जि : अध्यक्षा : मा : शमीभा ताई पाटील,यांच्या  सुचने नुसार,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात महत्वाची बैठक मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत, निवडणुकी साठी ता.अध्यक्ष : आयु : दिलीप डी : पोहेकर तसेच सह सचीव विश्वनाथ मोरे, त्याच प्रमाणे “अंतुर्ली” जि : परीषद एस : सी : या राखीव जागेचे आधिकृत उमेदवार व जेष्ट मार्गदर्शक : प्राध्यापक : आयु :  एस.एस .तायडे ( सर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक संदर्भात उमेदवारांची चाचपणी व मुलाखत, पदाधिकार्यांच्या निवडणूक संदर्भात सुचना, व माहिती जाणून घेऊन आर.एस.एस.प्रणीत बी.जे.पी.शिवसेना शिंदे गट,व राष्ट्रवादी अजित पवार गट सोडुन इतर सर्व पक्षांशी युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे.मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकी साठी वातावरण पोषक असुन घराणे शाही, हुकुमशाही , सरंजाम शाही असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकदीने लढणार व तीन ही गटात व सहा गणात उमेदवार उभे करुण भरघोष मतांनी निवडुन आनणार असा, आत्मविश्वास जिल्हा अध्यक्षा : मा :  शमीभा ताई पाटील,यांनी दिला.या प्रसंगी VBA चे तालुका उपाध्यक्ष, आयु : विठ्ठल भाऊ कोळी, VBA कोषाध्यक्ष वसंत दादा लहासे, VBA ता : महासचिव आयु : संजयजी  धुंदले ,VBA ता.प्रसिद्धी प्रमुख आयु :  संजय म्हसाने,संघटक रविंद्र चव्हाण, संजय माळी,सुनिल भिल्ल, गौतम धुंदले, महेंद्र शिरसाट, संतोष इंगळे, पंडीत महाले ,भागवत चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परतीच्या पावसाचा कहर: ‘पांढरे सोने’ भिजले, शेतकरी हवालदिल ; मजुरी- खर्च गगनाला, मालाला भाव नाही,

परतीच्या पावसाचा कहर: 'पांढरे सोने' भिजले, शेतकरी हवालदिल ; मजुरी- खर्च गगनाला,  मालाला भाव नाही,
 मोताळा तालुक्यात  अचानक आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यातील ‘पांढरे सोने’ म्हणजे कापूस पाण्यात बुडवले आहे.
पहलेच अतिवृष्टी व आता परतीच्या पावसामुळे वेचणीसाठी तयार असलेल्या पिकाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वेचणीचे दर ३० टक्क्यांनी वाढले, मजुरांचा खर्च दुप्पट झाला, कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आणि शेतमजुरी वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता गगनाला भिडली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने संकट आणखी गडद झाले आहे.कापूस भिजला, स्वप्ने भंगली   पाऊस मागील ३ ते ४ दिवसापासून थांबण्याचे नाव घेत नाही. कापूस वेचणीसाठी तयार असतानाच बोंडे भिजली. शेतकरी  प्राथमिक अंदाजानुसार, ४५-६० टक्के कापूस खराब झाला असून, उरलेल्या पिकाचा दर्जा घसरल्याने बाजारात कापसाला कमी भाव मिळत आहे  “वेचणीचे दर १० रुपये किलो आणि ५००-६०० रुपये, दिवसाची मजुरी काही ठिकाणी सतत पाऊस चालू असल्यामुळे  मजूर म्हणतात ‘पावसात काम नाही’पावसामुळे मजुरांची टंचाई भासत असून, कापूस वेचणीचे दर ३०-४० टक्क्यांनी वाढले आहेत. पूर्वी ३५०-४००रुपये दिवसाला मिळणारी मजुरी आता ५००-६०० रुपये झाली आहे. ” परिणामी, अनेक शेतकरी स्वतः कुटुंबासह शेतात उतरले आहेत, पण पाऊस थांबत नाही. 
व कापसाला अपेक्षित बाजारभाव सुद्धा मिळत नाही
साधारण कापसाला आज रोजी ६३०० ते ७००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे   बाजारात ७,००० रुपये मिळाले. गेल्या आठवड्यात ७,४०० पर्यंत भाव होते, पण पावसामुळे घसरण झाली. व्यापारी म्हणतात, “भिजलेला कापूस कुणी घेणार? दर्जा खराब, मागणी कमी.” झाली    बाजारात ६,५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सरकार खरेदी केंद्र का उघडत नाही?”सोयाबीनचे दर वाढले, पण उत्पादन घटले सोयाबीनला दिलासा मिळाला आहे. आज सरासरी ४,०००-४,३५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून, स्थानिक मंडित ४,३५० पर्यंत पोहोचले. गेल्या महिन्याच्या तुलनेत १०-१५ टक्के वाढ झाली. मात्र, पावसामुळे सोयाबीनचे पीक ३५-५० टक्के बाधित झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. एक शेतकरी म्हणाला, “भाव चांगले, पण धान्यच नाही. काय उपयोग करपणे मळणे व वाहतूक खर्च खूप वाढलेले असून मिळणारे उत्पन्न कमी आहे त्यामुळे यंदा शेतकरी हा तोट्यात आहे   त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आले आहेत.  लहान शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अशक्य होत आहे.सरकारची मदत अपुरी, शेतकरी रस्त्यावर?राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी पाहणी आणि अर्ज प्रक्रिया रखडली आहे.”शेतकरी हतबल  आहेत. सरकार झोपले आहे सरकारने शेतकऱ्यांच्या मालासाठी तात्काळ खरेदी केंद्रे, सुरू करावीत लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे मागणी केली आहे.

घोरपडवाडी ( ता. इंदापूर ) येथील ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची NSUI पुणे शहर आणि जिल्हा अध्यक्षपदी फेरनियुक्ती

घोरपडवाडी ( ता. इंदापूर ) येथील ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची NSUI पुणे शहर आणि जिल्हा अध्यक्षपदी फेरनियुक्ती
इंदापूर प्रतिनिधी :- काँग्रेस पक्षातील विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टूडेंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेच्या पुणे शहर व जिल्हाध्यक्षपदी घोरपडवाडी ता. इंदापूर येथील ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती NSUI प्रदेश अध्यक्ष सागर साळुंखे व राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी अक्षय यादव यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
NSUI ही देशातील सर्वात जुनी आणि सक्रीय विद्यार्थी संघटना असून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, शिक्षणातील समानता आणि संधीसाठी अखंड लढा देत आली आहे. स्वातंत्र्य, लोकशाही आणि सामाजिक न्याय या तत्वांवर आधारित ही संघटना देशभरात विद्यार्थी वर्गाचा आवाज बुलंद करते.
 ॲड. अभिजीत गोरे-देशमुख हे गेल्या ११ वर्षांपासून काँग्रेस पक्ष व NSUI संघटनेत सक्रिय कार्यरत आहेत. त्यांनी तालुका पातळीवरून कार्याची सुरुवात करून प्रदेश महासचिव पदापर्यंत प्रवास केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली NSUI ने पुणे विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये आंदोलने, निवेदन मोहिमा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
ॲड. गोरे-देशमुख हे विद्यार्थी प्रश्नांवरील आक्रमक भूमिका, संघटन कौशल्य आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी घट्ट संवाद यासाठी ओळखले जातात. विद्यार्थ्यांच्या फी वाढ, परीक्षा गैरव्यवस्था, महाविद्यालयीन सुविधांवरील अन्याय याविरोधात त्यांनी अनेक वेळा लढे उभे केले आहेत.
त्यांच्या या फेरनियुक्तीनंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक वरिष्ठ नेते, विद्यार्थी आणि कार्यकर्ते फोनद्वारे आणि सोशल मीडियावरून अभिनंदन करत आहेत.
ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांनी सांगितले की,
“NSUI ही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी झगडणारी विचारधारा आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय, संधी आणि सन्मानासाठी प्रत्येक कॉलेजच्या दारात ही संघटना उपस्थित राहील.
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्न हा आमचा स्वतःचा प्रश्न आहे.”
ही फेरनियुक्ती NSUI ला नवचैतन्य देणारी ठरणार असून पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी चळवळींना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.