Friday, November 21, 2025
Home Blog Page 3

मुक्ताईनगर नगरपंचायत मध्ये पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही.राजकीय पक्षांची लागणार कसोटी.

संदीप जोगी मुक्ताईनगर…..

सर्व राजकीय पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायत तिच्या पंचवार्षिक निवडणूक केला प्रक्रियेला सुरुवात झालेली असून दहा नोव्हेंबर रोजी नाम निर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष तसेच राजकीय पक्ष ची चांगलीच कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायती च्या निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षित असून शहरांमध्ये 17 प्रभाग आहेत. गेल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर पंचायत च्या निवडणुकीचा बिगुल वाजवला होता. मुक्ताईनगर नगरपंचायत प्रभागातील आरक्षण सोडत निघाल्यानंतर काही प्रभागांमध्ये काही खुशी काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली असून पुरुषांच्या ऐवजी महिलांना निवडणूक रिंगणात उभे करण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येते. परंतु गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांना देखील निवडणूक सोपे चित्र नसल्याचे दिसून येते. नगरपंचायती निवडणूक ही लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे निवडणूक लढली जाते. राज्यात महायुती चे सरकार असून महाविकास आघाडी तसेच अन्य राजकीय पक्ष निवडणूक रिंगणांमध्ये किती रस घेतात हे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या माघारीच्या दिवशी स्पष्ट होईल. बहुतांश प्रभागांमध्ये राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत परंतु तिकीट कोणाला द्यावे हे शेवटच्या दिवसापर्यंत सस्पेन्स ठेवले जाते. शेवटी कत्तल ची रात्र यासाठी निर्णायक ठरते.
.

शिवसेना (उबाठा) कडून मलकापूर उपजिल्हा रुग्णालय चे “रेफर टू बुलढाणा” नामकरण

आठ दिवसांत रुग्णालयाची परीस्थिती न सुधारल्यास तोडफोड करून ‘तालाठोको आंदोलनाचा” शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचा इशारा

मलकापुर:- मलकापुर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी,डॉक्टरांकडून जनतेला चुकीची वागणूक तसेच डिलेव्हरी पेशंट, किरकोळ तपासणी करता सुद्धा बुलढाण्याला रेफर करण्याची पद्धत बंद व्हावी यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन गजानन ठोसर, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण “रेफर टू बुलढाणा रुग्णालय “असे करुन गजानन ठोसर यांनी फित कापून उद्घाटन केले व आठ दिवसांत रुग्णालयाची परीस्थिती न सुधारल्यास तोडफोड करून रुग्णालयाला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा गजानन ठोसर यांनी दिला.
उपजिल्हा रुग्णालयात डिलिव्हरी साठी रुग्ण आले असता रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध राहत नसल्याची बाब अनेक वेळा समोर आली आहे,असाच प्रकार शनिवार दि.08 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता घडला मलकापूर शहरातील दोन डिलिव्हरी चे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात डिलिव्हरी साठी आले स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना फोन लावला मात्र दोन तास उलटून सुद्धा डॉ.आले नाही याबाबतची माहिती नातेवाईकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिली,माहिती मिळताच ठोसर यांनी रुग्णालयात धाव घेऊन उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. राजेश उंबरकर यांना भ्रमणध्वनीहून याची माहिती दिली, डॉक्टरांनी स्त्री रोग तज्ञ येत असल्याचे सांगून मात्र रात्री अकरा वाजे दरम्यान नेत्ररोग तज्ञ डॉ. क्षिरसागर आले, यावेळी उपस्थित कर्मचार्यांनी पेशंटची बीपी वाढलेली असल्याने पेशंटला जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे हलविण्याचा सल्ला दिला… बाळाची ही तब्येत नाजूक असून पेशंट बुलढाणा पर्यंत पोहोचणार नसल्याचेही भीती दाखवली, खाजगी रुग्णालयात नेऊन बीपी नॉर्मल करून सिझर डिलिव्हरी झाली, पेशंटला तिस हजारांचा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला, असा हा प्रकार दररोजचा झाल्याने आज सोमवार रोजी शिवसेना (उबाठा)च्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण “रेफर टू बुलढाणा रुग्णालय” असे करण्यात आले, आलेल्या रुग्णांना नानाविध कारणे सांगून रेफर टू बुलढाणा केले जाते सदर उपजिल्हा रुग्णालय गोरगरिब रुग्णांच्या सेवेत साठी नसून धनदांडग्या डॉक्टरांना उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य होत असल्याचा व कर्मचाऱ्यांना, डॉ.ना कमीशन मिळत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी केला आहे, उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती आठ दिवसात न सुधारल्यास या रुग्णालयाची तोडफोड करून रुग्णालयाला ताला ठोको करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी रक्तपेढी सुरू करुन सोनोग्राफी तज्ञांची नियुक्ती करावी ,डॉक्टरांनी नियमितपणे जनतेचा उपचार करण्यासाठी उपस्थित राहावे दवाखान्यातील बिघाड असलेल्या मशिनरी लवकरात लवकर सुरू करून जनतेच्या सेवेत कार्यान्वित कराव्या अशा विविध मागण्यांसाठी (उबाठा) शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज एल्गार केला यावेळी पोलीसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. या नामकरण आंदोलनात शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी, किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेहेंगे, माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे, माजी नगरसेवक पांडुरंग चीम, शिवसेना विभाग प्रमुख सत्तार शाह,राजू नेवे,शेख कलीम,ढोलकर, शेख नासीर शेख उस्मान, सै.सोहील निजाम, विजय झांबरे, समीर खान, शेख मोहसिन, जाफरभाई, ईमामशाह,हरीदास शिंदे, चेतन कहाते, कृष्णा चोपडे,वसीम लकी, वसीम जमादार, उखर्डा तांदूळकर, दीपक कोथळकर,सै.अकरम मूर्गीवाले,जाफर पटेल, शेख असलम बागवान,
समीर खान टेलर,
मो अशफाक, एजाज खान, शेख रफिक शेख नबी, शेख एजाज, शेख समीर सह आदींची उपस्थिती होती.

मुक्ताईनगर इथे 10 नोव्हेंबर पासून पर्मनंट सुरक्षा रक्षक भर्ती सुरू

संदीप जोगी मुक्ताईनगर……

सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या
उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट 2005 च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आय.एस.ओ. (ISO) मान्यताप्राप्त , भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर. जि. जळगाव.
प्लेसमेंट सेल. यांच्या संयुक्त विद्यमाने आज 38 तरुणांनी भरती ठिकाणी उपस्थिती दिली आणि 30 मुलांचं सिलेक्शन झाले व कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.वंदना चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. अतुल वाकोडे सर व सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या भरतीस बेरोजगार युवकांना पर्मनंट नोकरीं दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व सुविधा ज्यामध्ये पी. एफ. सुविधा, मेडिकल, ग्रॅजुटी, पी. एफ. पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील, तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमाप्रमाणे पेमेंट मिळणार आहे जे 15000/- ते 23000/-रु. पर्यंत सुरुवातीस मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील. भरती होणाऱ्या तरूणांना महाराष्ट्रामध्ये मध्ये नौकरी दिली जाणार आहे,
ही भरती प्रक्रिया दि.10 नोव्हेंबर २०२५ ते 14 नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर.ता. मुक्ताईनगर. . जि. जळगाव येथे सुरू राहणार आहे. तरी 14 नोव्हेंबर पर्यंत या सुवर्ण संधी चा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन वं उप-प्राचार्य डॉ. संजीव साळवे यांनी केले आहें.
भरती साठी कागदपत्रे:
1)आधार कार्ड झेरॉक्स
2)10/12वी /ग्रॅज्युशन पैकी 1 झेरॉक्स.
3)पासपोर्ट साईझ 2 फोटो घेऊन येणे.

विद्यार्थ्यांनी महामानव डॉ.बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा — शरद बोदडे

Oplus_16777216

(अतिक मुक्ताईनगर )

सविस्तर असे की
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा…

मुक्ताईनगर — शिक्षण हेच अज्ञानातून ज्ञानकडे व प्रगतीची दारे उघडणारे एकमेव महत्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या सहाय्यानेच बाबासाहेबांनी देशात क्रांती घडवून आणली. आणि एक आदर्श विद्यार्थी कसा असतो हे जगाला दाखवून दिले. म्हणून विद्यार्थ्यांनी महामानव डॉ.बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा असे आवाहन उपशिक्षक शरद बोदडे यांनी केले.मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात आयोजित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून उपाशिक्षक शरद बोदडे हे बोलत होते.

      कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र  अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक उपशिक्षिका वैशाली सोनवणे यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आंबेडकरांच्या शिक्षणप्रेरक विचारांवर आधारित मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी ‘शिक्षण हेच खरे शस्त्र’ या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

श्री. बोदडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकरांच्या मार्गावर चालण्याचे, त्यांचा आदर्श घेण्याचा संदेश दिला. ज्ञान प्राप्त करून समाजउन्नतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

   कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘मी ही डॉक्टर आंबेडकरांसारखा शिकेन’ अशी शपथ घेतली.

शाळा परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाशीक्षक शरद चौधरी यांनी केले तर आभार लिपीक नवल कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका श्रीमती कोसोदे, श्रीमती दुट्टे तसेच लिपीक भूषण पानपाटील, शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती विजया सोनवणे आणि स्वप्नील पाटील यांनी परिश्रम घेतले.

वडगाव येथे रब्बी हरबरा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक संपन्न

वडगाव येथे रब्बी हरबरा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक संपन्न मौजे वडगाव ता.शहादा जि.नंदुरबार येथे कृषि विभागा मार्फत रब्बी हंगाम गाव बैठक घेऊन हरबरा ,गहु , रब्बी ज्वारी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी सुनील सुळे यांनी उपस्थित शेतकर्‍याना राज्यात आता रब्बी हंगामाला सुरुवात असुन रब्बीचे मुख्य पिक असलेले हरबरा ,गहू , ज्वारी पिकाचे पेरण्यांना वेग येतोय खरीप हंगाम नंतर व यंदाच्या अवकाळी व सततसच्या पावसामुळे जमिनीतुन अनेक किड आणी रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता असते.हे टाळण्यासाठी बियाणाचे पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करणे खुप गरजेचे असते बिजप्रक्रियामुळे .पिकाचे किड/रोगा पासुन संरक्षण होत उगवण चांगली होते उत्पादनातही वाढ होते. बिज प्रक्रिया म्हणजे काय सोपे भाषेत बिज प्रक्रिया म्हणजे लसीकरण कोणतेही रोग होऊ नये म्हणुन जसे आपण लस टोचुन घेतो त्याच प्रकारे जमिनीतुन होणारे रोग आणी किडीचे प्रार्दुभाव आपण रोखण्यासाठी पेरणीपुर्वी बियाणेवर प्रक्रिया करणे सेंद्रिय व रासायनिक बुरशीनाशके किटकनाशके यांचा द्रावणात लेप लावुन पेरणी करणे बिज प्रक्रियामुळे वीस ते पंचवीस टक्के नत्राचे बचत होते दहा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ होऊन किड व रोगा पासुन मुक्त ठेवण्याचे काम बिज प्रक्रिया मुळे होते हरबरा प्रतिकिलो बियाण्यास 6 ग्राम ट्राॅयकोडर्माची बिजप्रक्रिया करावी ,रायझोबियम आणि स्पुरद विरघळवणारे जिवाणु 250 ग्राम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावमध्ये मिसळावे बियाणे आर्धा तास सावलीत सुकवुन पेरणी करणे यामुळे मररोग ,नञ स्थिरकरण व स्पुरद उपलब्धेते साठी ,रब्बी ज्वारी 3 किलो मीठ 10 लिटर पाण्यात मिसळावे 30 टक्के मीठाचे द्रावण या द्रावणात बियाणे ओतावे , माहाडीबीटी अंतर्गत ट्राॅक्टर ,औजारे ,पाँकहाऊस ,कांदाचाळ ,शेडनेट,ठिंबक सिंचन योजना कागदपञे व हमीपञ ,बंधपञ,सामाईक खातेदार सम्मंञी पञासह सह अपलोड करणे आदि योजने बाबत माहिती दिली यावेळी सरपंच दिनेश पावरा ,उपसरपंच विजय सोनवणे , मा.पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे ,ग्राम पंचायत सदस्य पवन सुळे ,वन समिती अध्यक्ष दिलीप वळवी माजी सरपंच रमेश जाधव ,प्रगतिशील शेतकरी संजय वळवी ,सतोंष सुळे नानसिंग भिल , सायसिंग पावरा आनंद वळवी ,दिपक घोडसे आदी शेतकरी उपस्थित होते,

रावेर तालुक्यातील निंबोल परिसरात सट्ट्यासोबत पत्त्याच्या क्लब जोरात चालू याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष यावर कारवाई होईल का?

रावेर तालुक्यातील निंबोल परिसरात सट्ट्यासोबत पत्त्याच्या क्लब जोरात चालू याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष यावर कारवाई होईल का?
लेखणी शस्त्र रावेर तालुका प्रतिनिधी-
विनोद हरी कोळी
रावेर तालुक्यातील निंबोल गावातील परिसरात बऱ्याच दिवसापासून अवैद्य धंदे तसेच विनापरवाना पत्त्याचे क्लब जोरात चालू आहे. याकडे संबंधित पोलीस प्रशासन त्वरित लक्ष देईल का असा सवाल गावातील नागरिकांकडून होत आहेत.
तसेच गावातील पन्नी दारू सध्या तरी पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बंद करण्यात आलेली आहे. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे गावकऱ्यांच्या वतीने कौतुक होत आहेत, परंतु इकडे सट्टा क्लब मात्र जोरात चालू आहे. हा क्लब कायमचा बंद करण्याची मागणी मात्र होत आहेत. तसेच निंबोल परिसरातील सट्टा क्लब आठ दिवसाच्या आत जर का बंद झाला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसे लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात येईल याची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहेत.

रावेर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांचे अपसोय संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष

Oplus_16777216

रावेर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांचे अपसोय संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष,,, लेखणी शस्त्र रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळीरावेर ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक6 नोव्हेंबर या रोजी डॉक्टर पद्म्युन्न महाजन हे हजर असताना, तसेच सर्व नर्स, हजर असताना सुद्धा त्यांचे काम ग्रामीण रुग्णालय मधील शिपायांना करावे लागत आहेत. नियम व कायदे यांना धाब्यावर बसवून ग्रामीण रुग्णालय मध्ये यांचे मनमानी चालत आहेत. तसेच संबंधित रुग्ण यांना काही जखम झाली किंवा दुखापत झाली, तर त्या रुग्णांना ड्रेसिंग चे काम नर्स यांचे असते, परंतु तसे न होता, ड्रेसिंग चे काम ग्रामीण रुग्णालय मधील डॉक्टर व नर्स यांचे काम शिपायांना कोणताही अनुभव नसताना तसेच डॉक्टरची डिग्री नसताना करावे लागत आहेत. मग डॉक्टर M.S डॉक्टर यांचे काय काम आहे, असा सवाल संबंधित रुग्णांकडून बोलले जात आहेत, तसेच डॉक्टर पद्मिन महाजन यांना तसे विचारले असता, आमच्याकडे डॉक्टरांचा व नर्स यांचा स्टॉक कमी आहेत, त्यामुळे शिपाई यांना ड्रेसिंग चे काम करावे लागत आहेत, असे उत्तर दिले, परंतु शिपाई यांना कोणताही पूर्व अनुभव नसताना रुग्णाची ड्रेसिंग करणे चुकीचे आहे. तसेच रुग्णयांचे ड्रेसिंग करीत असताना, काही इन्फेक्शन बरे वाईट झाले तर, याला जबाबदार कोण राहील असा सवाल नागरिकांकडून बोलला जात आहेत. असे बऱ्याच दिवसापासून ग्रामीण रुग्णालय मध्ये चालत आहेत, त्यामुळे ग्रामीण रुग्णालय कडे आता तरी TMO, DHO यांनी त्वरित लक्ष घालावे, नाहीतर रुग्णांच्या काही बरे वाईट झाले तर, याला जबाबदार संबंधित वरिष्ठ अधिकारी असतील.

वादांची नौटंकी की 1800 कोटींच्या घोटाळ्याचं आच्छादन? – प्रशांत पाटील

वादांची नौटंकी की मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न? – प्रशांत पाटील

राजकीय नौटंकी की जनतेपासून लक्ष विचलित करण्याचा डाव? – प्रशांत पाटील

बुलढाणा – राज्याच्या राजकारणात सध्या एक विचित्र दृश्य दिसतंय पार्थ पवार, रूपाली चाकणकर आणि रूपाली ठोंबरे यांच्या नावाने सुरू असलेले वाद, आरोप-प्रत्यारोप यांचा गजर संपूर्ण माध्यमांमध्ये आहे. पण या सगळ्या गोंधळामागे नेमकं काय लपवलं जातंय, हा खरा प्रश्न आहे.

गेल्या काही दिवसांत पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याचा आरोप झाला.
या प्रकरणात महार वतनाची, कोरेगाव येथील ४३ एकर जमीन जी बाजारभावाने सुमारे १८०० कोटी रुपयांची आहे ती केवळ ३०० कोटींना खरेदी करण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यातच २१ कोटींच्या स्टॅम्प ड्यूटीच्या जागी केवळ ५०० रुपयात व्यवहार पूर्ण केल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.

पण आश्चर्य म्हणजे, या विषयावर चर्चा होण्याआधीच माध्यमांमध्ये रूपाली चाकणकर आणि रूपाली ठोंबरे यांच्या ‘वादळाने’ सगळं लक्ष खेचून घेतलं. दोन महिलांच्या वैयक्तिक भांडणाच्या मुद्द्याला दिलेलं अतिप्रमाणात महत्त्व, हे केवळ जनतेचं लक्ष मुख्य विषयापासून म्हणजेच पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणापासून विचलित करण्याचं प्रयोजन नाही का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

राज्याच्या जनतेसमोर आज प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न उभे आहेत. पण माध्यमांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रचारयंत्रणेत फक्त वाद, खोट्या नाट्या आणि वैयक्तिक टीका चालू आहे.

राजकारणातील हे ‘नाट्य’ म्हणजे जनतेला मूळ प्रश्नांपासून दूर ठेवण्याची पद्धत बनली आहे.
जनतेने आता हे ओळखायला हवे की जेव्हा जेव्हा एखादा गंभीर घोटाळा उघडकीस येतो, तेव्हा त्याच वेळी कुठेतरी एक “वाद” उभा राहतो आणि तोच संपूर्ण चर्चेचा विषय बनतो.

जनतेला भ्रमात ठेवण्याचा हा खेळ थांबवला नाही, तर पुढची पिढी प्रश्न विचारणंही विसरेल.

राजकारणात पारदर्शकता आणि जबाबदारी हीच खरी शक्ती आहे आणि ती हरवली, तर सगळं काही केवळ नाट्य बनून राहील असे मत प्रशांत ढोरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

शहादा येथे बिरसा मुंढा चौकाच्या सुशोभीकरणाला सुरुवात क्रांतिवीर स्मारक बहुउद्देशीय संस्थेंचा उपक्रम

Oplus_16777216


शहादा तालुक्यात बिरसा मुंढा स्मारक बहुउद्देशीय संस्था तर्फे यांच्या अथक प्रयत्नाने आणि आमदार राजेश पाडवी यांच्या सहकार्याने शहादा चौकाच्या भव्यदिव्य स्मारक सुशोभीकरणाच्या कामाला 7/11/2025 रोजी संस्थापक तसेच आध्यक्ष क्रुषी अधिकारी श्री सुनिल सुळे यांच्या हस्ते कामांची औपचारिक सुरुवात करण्यात आली
या प्रसंगी उपस्थित संस्थेचे सचिव श्री मनोहर पावरा व विधीतज्ञ अँड चंपालाल भंडारी, संस्था चे संचालक व उपसरपंच सचिन पावरा, इंजिनिअर महेश रावताळे,जगन ठाकरे इंजिनिअर मनोज खर्डे तसेच आदिवासी टायगर सेना चे उत्तर महाराष्ट्र आध्यक्ष रविंद्र ठाकरे,जय आदिवासी युवा बिर्गेड चे तालुका अध्यक्ष सुनील माळी,वीर खाज्या नाईक युवा सेना अध्यक्ष व सरपंच दिपक ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पराडके,भील सेवा विकास मंच राजु सोनवणे जाम गावाचे सरपंच सुभाष वाघ,व वागर्डे गावाचे सरपंच सखाराम मोते वडगाव सरपंच दिनेश पावरा,चांदसैली संजय पाडवी, संतोष वळवी व रोननी भंडारी उपस्थित होते
तसेच 78 वर्ष च्या प्रतीक्षेत नंतर हा ऐतिहासिक क्षण स्वातंत्र्य नंतर तब्बल 78 वर्ष चे नंतर भगवान बिरसा मुंढा यांच्या 151 व्या जंयती निम्मत्त बिरसा मुंढा शहादा चौकात सुशोभीकरण होत असुन सर्व आदिवासी समाजात हा अभिमानाचा ऐतिहासिक क्षण आसुन या सुशोभीकरण बांधकाम करिता दान श्री प्राध्यापक श्री सखाराम मोते यांनी सुध्दा दहा हजार करण्यात आले तसेच या स्मारक करण्या करिता सर्व आदिवासी समाज हे अभार व्यक्त करित आहे

कार्यकर्ता या नाटकाचे उदघाटन सेवाभावी संस्थेच्या राज्यध्यक्षा डॉ सौ सुनिताताई मोडक यांच्या हस्ते


सेवाभावी प्रबोधन समिती राज्य अध्यक्षा डॉ सौ सुनिता मोडक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये त्यांच्या हस्ते लेखक दिग्दर्शक श्री प्रताप पवार लिखित
” कार्यकर्ता ” या दोन अंकी नाटकाच्या प्रयोगाचे उदघाटन विष्णुदास भावे रंगायतन नवी मुंबई येथे आज झाले.
यावेळी सेवाभावी प्रबोधन संस्थेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, कोकण विभागीय कार्यकारिणी , कृतिका मोरे, प्रज्ञा जाधव, प्रियंका समुद्रे, भोईर सर ,तसेच रायगड जिल्हाध्यक्ष श्री श्रीराम मांगले, उपाध्यक्ष श्री सुदर्शन कोटकर, जिल्हा संपर्कप्रमुख श्री गणेश घाग, या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला
सामान्य कार्यकरताच खर वास्तव्य लोकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या व्यावसायिक नाटकाच्या रूपाने, लेखक श्री प्रताप पवार यांनी केले आहे,
लेखणी शास्त्र न्यूज तालुका प्रतिनिधी सुदर्शन कोटकर

रिलायन्सच्या विषारी पाण्याने अंबानदीत हाहाकार ;मासे मृत मच्छिमार उध्वस्त,


अंबा नदीतील रिलायन्सच्या प्रदूषणामुळे मच्छीमार संकटात; प्रसाद दादा भोईर, शिवसेना (उबाठा) रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आक्रमक, फौजदारी कारवाईची मागणी
: रिलायन्स कंपनीकडून अंबा नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे सोडण्यात येणाऱ्या विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करत आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रिलायन्स कंपनीकडून केमिकलयुक्त आणि विषारी सांडपाणी थेट अंबा नदीत सोडले जात आहे. या रासायनिक प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावत आहेत किंवा स्थलांतर करत आहेत. मच्छीमारांनी पकडलेल्या मासळीलाही रासायनिक वास येत असल्याने ती बाजारात विकली जात नाही, ज्यामुळे हजारो भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) यावर तत्काळ कारवाई केली नाही, तर जनआंदोलन उभारले जाईल असा स्पष्ट इशारा प्रसाद भोईर यांनी दिला आहे. प्रांताधिकारी यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.
सदर शिष्टमंडळात पेण तालुका प्रमुख समिर म्हात्रे, माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, पेण शहर प्रमुख सुहास म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख भगवान पाटील, तालुका युवा अधिकारी योगेश पाटील, विभाग प्रमुख, नंदू म्हात्रे, दिपक पाटील, चंद्रहास म्हात्रे,जयराम बडे आदि उपस्थित होते.
लेखणी शस्त्र न्यूज तालुका प्रतिनिधी सुदर्शन कोटकर

मुक्ताईनगर नगरपंचायत साठी भाजपा कडून इच्छुक उमेदवारांची घेण्यात आली मुलाखत…

(अतिक खान मुक्ताईनगर)

मुक्ताईनगर येथील खासदार संपर्क कार्यालय येथे भारतीय जनता पक्ष मार्फत नगरपंचायत निवडणूक २०२५ साठी भाजपा कडून इच्छुक उमेदवारांचा परिचय जिल्हा निवडणूक प्रभारी मंत्री श्री. संजय सावकारे व आमदार श्री. अमोल जावळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

भाजपा मार्फत ३८ लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी ३० कार्यकर्त्यांनी मुलाखत दिली. नगराध्यक्ष महिला पद राखीव असून, सदर पदासाठी नजमा इरफान तडवी, भावना ललित महाजन, निता प्रविण पाचपांडे, तहजीब बी सना जहांगिर खान, गायत्री विनोद सोनवणे व इतर इच्छुक आहे.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल जवरे, भाजपा तालुकाध्यक्ष (उत्तर) मोहन महाजन व भाजपा तालुकाध्यक्ष (दक्षिण) जयपाल बोदडे, तालुका सरचिटणीस श्री. पंकज कोळी, श्री. उमेश कोळी, श्री. अतुल महाजन, श्री. चंद्रकांत भोलाणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथे 10 नोव्हेंबर पासून पर्मनंट सुरक्षा रक्षक भर्ती सुरू…

संदीप जोगी…. मुक्ताईनगर..,

सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा अ‍ॅक्ट 2005 च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मान्यताप्राप्त , भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गोदावरी बाई गणपतराव खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर. जि. जळगाव प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 नोव्हेंबर २०२५ ते 14 नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरक्षा रक्षक , भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरतीस बेरोजगार युवकांना पर्मनंट नोकरीं दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व सुविधा ज्यामध्ये पी. एफ. सुविधा, मेडिकल, ग्रॅजुटी, पी. एफ. पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील, तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमाप्रमाणे मिळणार आहे जे 15 हजार ते 23 हजार पर्यंत सुरुवातीस मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील. भरती होणाऱ्या तरूणांना महाराष्ट्रामध्ये मध्ये नोकरी दिली जाणार आहे,
ही भरती प्रक्रिया दि.10 नोव्हेंबर २०२५ ते 14 नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर.ता. मुक्ताईनगर जि. जळगाव येथे सुरू राहणार आहे. तरी 14 नोव्हेंबर पर्यंत या सुवर्ण संधी चा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा.
भरती साठी कागदपत्रे:1)आधार कार्ड झेरॉक्स 2) ,10/12वी /ग्रॅज्युशन पैकी 1 झेरॉक्स. 3)2 पासपोर्ट साईझ 2 फोटो घेऊन येणे. जागा भरल्यानंतर भरती प्रक्रिया बंद केली जाईल असे आवाहन . प्राचार्य , तसेच भरती अधिकारी यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी उप-प्राचार्य प्रा.डॉ.संजीव साळवे-९४२३९१४३७१ तसेच प्रा.डॉ.अतुल वाकोडे -९७३०८९५०८८ यांचेशी संपर्क साधावा.

शहरे जगण्यालायक बनविली पाहिजेत” जोहरान ममदानी — न्यूयॉर्क महानगराचे नवे महापौर

लेखक : अतिक खान, विभागीय संपादक — जळगाव खान्देश

न्यूयॉर्कसारख्या जगप्रसिद्ध महानगरात राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

जोहरान ममदानी यांनी नुकताच न्यूयॉर्क महानगराच्या महापौरपदाचा विजय मिळवला — आणि त्यांचा संदेश स्पष्ट आहे :

“शहरे जगण्यालायक बनविली पाहिजेत!”

ममदानी यांनी निवडणुकीच्या प्रचारात आणि विजयावेळी मांडलेले विचार हे केवळ न्यूयॉर्कपुरते मर्यादित नाहीत, तर जगातील प्रत्येक शहरासाठी दिशादर्शक आहेत.

त्यांच्या राजकीय अजेंड्यातील काही ठळक मुद्दे :

सार्वजनिक वाहतूक आणि घरभाडे यावर नियंत्रण ठेवून ५०% कपात

सर्वसामान्यांसाठी सुलभ निवास योजना

कामकरी कुटुंबातील मुलांसाठी पाळणाघरे व शिक्षण व्यवस्था

पिण्याचे पाणी, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था यांना प्राथमिकता

या सर्व योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी श्रीमंतांवर योग्य कर

आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे युद्धविरोधी भूमिका!

ममदानी म्हणतात — “शहर म्हणजे फक्त इमारतींचा समूह नव्हे, तर त्या शहरात जगणाऱ्या लोकांच्या स्वप्नांचा थर आहे.”

त्यांनी विजय मिळवताना एक महत्त्वाचा उल्लेख केला —

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा.

त्यांच्या “धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सहिष्णुता” या तत्त्वांचा त्यांनी अंगीकार केला आहे.

द्वेष, वंशवाद आणि श्रीमंतांच्या वर्चस्वावर आधारित राजकारणाला त्यांनी ठामपणे नकार दिला.

स्वतःला “लोकशाही समाजवादी” म्हणवून घेत त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक न घालता आपल्या लोकहिताच्या विचारांनी विजय संपादन केला.

आज प्रत्येक महानगराला — मुंबई असो, दिल्ली, लंडन, पॅरिस, टोकियो अशाच लोकाभिमुख, मानवकेंद्री नेतृत्वाची गरज आहे.

न्यूयॉर्कसारख्या शहरात जर समानता आणि संवेदनशीलतेचं राजकारण उभं राहू शकतं,

तर जगभर आशावाद पुन्हा फुलू शकतो…

होय, आशावाद अजून जिवंत आहे!

ZohranMamdani NewYorkMayor लोकाभिमुखराजकारण शहरविकास

नगरपरिषद निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

नगरपरिषद निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलढाणा : जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.

या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार, जिल्हा सह आयुक्त पेंटे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आदर्श आचारसंहिता, प्रतिबंधात्मक आदेश, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, मतदान आणि मतमोजणी विषयक तयारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, विविध भरारी पथकांच्या नियुक्त्या, मतदान केंद्रांवरील सोयीसुविधा, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट वाटपाचे व्यवस्थापन, मतमोजणी केंद्रावरील सोयीसुविधा, कायदा व सुव्यवस्था, विविध समित्यांच्या नेमणुका आदी विषयांचा आढावा घेवून सविस्तर चर्चा करण्यात आली.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने यंत्रणा सज्ज ठेवावे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश जारी करावे. मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांची खात्री करावी. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्या. प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वी विविध भरारी पथके कार्यान्वित करावी. नियंत्रण कक्ष स्थापन करुन मतदारांसाठी मदत क्रमांक जारी करावे. नगरपरिषद निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी या बैठकीत दिले.

कोलते इंजिनिअरिंगमधील विद्युत अभियांत्रिकी विभागातील विनय जयंत पाटील याने अमरावती विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून महाविद्यालयाचा गौरव वाढविला

मलकापूर (प्रतिनिधी): पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथील अंतिम वर्ष विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी विनय जयंत पाटील याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.या भव्य यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्याच्या क्रीडाप्रेम, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावामुळे मिळालेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांनी विनयचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की,“आमच्या विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे तर संपूर्ण संस्थेसाठी गौरवाची बाब आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच आमचे विद्यार्थी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहेत.” महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी विनयला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की,“क्रीडा हा व्यक्तिमत्व विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही आपली कामगिरी सिद्ध करावी, हीच खरी प्रगती.”

या यशात क्रीडा प्रमुख प्रा. सचिन बोरले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी विनयच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे कौतुक करताना सांगितले की,“विनयने नियमित सराव, शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि सकारात्मक वृत्तीमुळे हे यश मिळवले आहे. त्याच्याकडे पुढे राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवण्याची क्षमता आहे.” या यशाबद्दल विनय पाटीलने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की,“हे यश माझ्या शिक्षकांचे, क्रीडा प्रमुखांचे आणि महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण पाठबळाचे फळ आहे. मी आणखी मेहनत घेऊन राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवण्याचा प्रयत्न करीन.”

संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, तसेच खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांनीही विनयचे अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठी यशस्वी कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की,“संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जाते. अशा विद्यार्थ्यांमुळे संस्थेचा गौरव वाढतो आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते.”या स्पर्धेत अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक महाविद्यालयांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रखर स्पर्धेमध्ये विनयने उत्कृष्ट कौशल्य आणि फिटनेस दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या दमदार कामगिरीमुळे परीक्षकांनी त्याला रौप्य पदकासाठी निवडले.महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, शिक्षकवर्ग, तसेच विद्यार्थ्यांनी विनयचे कौतुक करून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मिशन परिवर्तन अंतर्गत निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा उत्साहात

बुलढाणा : अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “मिशन परिवर्तन” उपक्रमांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून दि. 26 जून 2025 पासून जिल्ह्यात व्यापक प्रमाणात अंमली पदार्थविरोधी अभियान सुरू असून, या उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 8 नोव्हेंबर रोजी आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड, तसेच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. रणजितसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध श्रेणीतील विजेत्या विद्यार्थ्यांना मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लोणार, धाड, खामगाव, चिखली, अमडापूर, नांदुरा, संग्रामपूर, देऊळगाव राजा, जानेफळ, बुलढाणा ग्रामीण आणि बुलढाणा शहर यांसह सर्व पोलीस ठाण्यांतील विजेते विद्यार्थी या सन्मानासाठी उपस्थित होते.

परिक्षकांचा विशेष गौरव

निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे परिक्षण करणारे श्री. पठाण सर, डॉ. गायत्री सावजी, डॉ. शिवशंकर गोरे, डॉ. शिवाजी देशमुख, किरण वाघमारे यांसह अन्य परिक्षकांचेही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. गवई यांच्या पथकाने सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. यानंतर पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांनी प्रास्ताविक करत मिशन परिवर्तनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे म्हणाले की,
“व्यक्तीच्या आयुष्यात मेहनत हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. मेहनतीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते.”
तसेच त्यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, शिस्तीचे महत्व आणि नशामुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.

अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड यांनी मिशन परिवर्तन अंतर्गत जिल्हा पोलीस दलाने राबविलेले उपक्रम मांडले. अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी जिल्ह्यातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करून पोलीस दलासोबत पुढील विविध उपक्रम राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.

प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाला पोनि. सुनिल अंबुलकर, पोनि. रवि राठोड, पोनि. बाळकृष्ण पावरा, पोनि. गजानन कांबळे, सपोनि. दिपक ढोमणे, विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच जिल्ह्यातील पत्रकार सज्जन, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गायत्री सावजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मृणाल सावळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थागुशा बुलढाणा आणि पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
oplus_2097154

राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा अधिकार अनुषंगिक तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्रदान केला असून, या अधिकारांचा वापर करून मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार प्रभाग, निवडणूक प्रक्रिया आणि संबंधित सर्व तारखा निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिध्दीपत्रकानुसार, प्रभाग क्रमांक १ ते १५ साठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये संतोष शिंदे (उपविभागीय अधिकारी, मलकापूर), तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून संजय केदार (मुख्याधिकारी, नगर परिषद मलकापूर) आणि राहुल तायडे (तहसीलदार व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी, मलकापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरण्यासाठी १० नोव्हेंबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रांची प्रत्यक्ष स्वीकारणी ही याच काळात सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात येईल. रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

नामनिर्देशन पत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असून, वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी जाहीर केली जाईल. नामनिर्देशन माघार घेण्यासाठीची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. वैध उमेदवारीच्या यादीविषयी अपील करायचे असल्यास, जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येणार आहे. अपीलवरील निर्णय २१ ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दिला जाणार आहे.

निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल. आवश्यक असल्यास मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत घेण्यात येईल. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० पासून शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय, मलकापूर येथे होईल. प्रकरणाचा अंतिम निकाल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात १० डिसेंबर २०२५ पूर्वी प्रकाशित केला जाणार आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे ३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण १६ नोव्हेंबर, २२ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी होणार आहे. राजकीय पक्षांची बैठक ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात घेण्यात येईल. तसेच क्षेत्रीय अधिकारी, झोनल अधिकारी, मदत कक्ष आणि आदर्श आचारसंहिता समितीची स्थापना करण्यात आली आहे.

याशिवाय, अनुसूचित जाती – २, नामनिर्देशन मागास – ८ आणि सर्वसाधारण – २० अशी आरक्षण रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती महिला – १, मागासवर्गीय महिला – ४ आणि सर्वसाधारण महिला – १० जागांचा समावेश आहे. मलकापूर नगर परिषदेतील एकूण मतदारसंख्या ५७,७८६ असून यात पुरुष मतदार २९,३२९, महिला मतदार २८,४६१ आणि इतर मतदार ४ अशी नोंद आहे. शहरात ईव्हीएमची मागणी, वाहतूक व्यवस्था, साहित्य पुरवठा आणि मतदान केंद्रांची स्थापना पूर्ण करण्यात आली असून आचारसंहितेचे काटेकोर पालन सुरू आहे.

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी १० ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याची सुधारित माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

अंतुर्ली येथील श्रावण एस. तायडे सरांचा ‘राष्ट्र गौरव पुरस्कार 2025’ ने सन्मान

(अतिक खान मुक्ताईनगर):
अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ श्रावण एस. तायडे सर यांना शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “राष्ट्र गौरव पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला. हा भव्य पुरस्कार सोहळा डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया (आय.एस.ओ. 2015 मानांकित संस्था) तर्फे मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये संपन्न झाला.

श्रावण तायडे सरांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत एम.ए., एम.एड. पर्यंतची पदवी प्राप्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करणे आणि सामाजिक बांधिलकी जपत जनसामान्यांच्या अडचणींना हात घालणे या त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

तायडे सरांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेत डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया ने त्यांना “राष्ट्र गौरव पुरस्कार 2025” ने गौरविले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या सन्मानाबद्दल तायडे सर म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे तर ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. समाज uplift करण्याचे कार्य पुढेही सुरू राहील.”

कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडण्यात आयोजक मंडळाने उत्तम समन्वय साधला. उपस्थितांनी तायडे सरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भरदिवसा घरफोडी; चाकूचा धाक, स्प्रे मारून दरोडा — गुन्हेगारांना शिक्षा देण्याची मागणी


चिखली | प्रतिनिधी : तालुक्यातील धोत्रा नाईक येथे दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवत व अंगावर स्प्रे मारून अज्ञातांनी घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना धोत्रा नाईक येथे २७ ऑक्टोंबर रोजी १२:३० च्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी ३ नोव्हेंबर रोजी अमडापूर पो.स्टे.ला निवेदन देवून करण्यात आली आहे.
मनोज वामन पानगोळे रा. धोत्रा नाईक यांनी या संदर्भात ३ नोव्हेंबर रोजी अमडापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता तीन अज्ञात व्यक्ती एका दुचाकीवरून आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. घरातील लहान भावजय घरी असताना त्यांनी तिच्यावर आणि घरातील कुत्र्यावर स्प्रे मारून घरात प्रवेश केला.
त्यानंतर कपाटातील रु. ७०,००० रोख रक्कम, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी,१ चांदीचे ब्रेसलेट,आणि सुमारे ५ ग्रॅम सोन्याची पोथ असा मिळून जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी दरम्यान भावजयच्या उजव्या हातावर दांड्याने मारहाण करण्यात आली तसेच चाकूचा धाक दाखवून “तुमच्या घराला चांगली अद्दल घडवू” अशी धमकी देण्यात आली.विशेष म्हणजे, पानगोळे यांच्या घरात सन २०२२-२३ मध्येही अशाच प्रकारे पावडर टाकून चोरी झाली होती. पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा प्रकार घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची चौकशी करून आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पानगोडे यांच्याकडून करण्यात आली आहे.